मल्हार महुडे
नाम्या आज निवांत बसला होता.
काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.
मिसळपाव