(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे)
तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा.