Skip to main content

संस्कृती

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/01/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/01/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात.

माझी निवड चुकली तर नाही ना?

लेखक मोगॅम्बो यांनी शनिवार, 24/01/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद. एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय.

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 23/01/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

बायबल-कारी.

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 22/01/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभी देवाने स्थलावकाश व समरभूमी निर्माण केली. तेव्हा (समर)भूमी आय्डीविरहीत व शून्य होती, आंतरजालीय पृष्ठावर गांभीर्याचा अंधःकार होता आणि देवाचा आत्मा (आंतर)जालावर तळमळत राहिला होता. तेव्हा देव बोलला, हास्यचैतन्याचा प्रकाश होवो आणि प्रकाश झाला ! देवाने हास्य-चैतन्य-प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने हास्यप्रकाश आणि प्रशासकी गांभीर्यांधार वेगळे केले. देवाने हास्यप्रकाशाला दिवस आणि गांभीर्यांधाराला रात्र म्हण्टले ; हा पहिला दिवस. मग देव म्हणाला, आंतरजालाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते आंतरजालास (म्हणजे त्यातील लोकांस एकमेकांमधे) विभागणारे होवो.

मनाच्या कुपीतले -क्षण

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 21/01/2009 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा चवथा लेख .........
क्षण
कोणी एक नवा जीव जेंव्हा भूतलावर अवतरतो. तो क्षण त्याचा......... बऱ्याच प्रयत्नानंतर जेंव्हा एक कोवळा जीव टाहो फोडतो. तो क्षण त्याचा. .................. 8-9 महिन्यानंतर चिमुकल्याचे चालणे, ते पहिले पाऊल पडण्याचा क्षण त्याचा. ............. 3 ऱ्या वर्षी जेंव्हा ते बाळ शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतं. तो क्षण त्याचा. ............. तोच बाळ जेंव्हा । अशी ग ची पहिली रेप ओढतो..... तो क्षण त्याचा............. जेंव्हा एखादा मुलगा पहिले बक्षीस घ्यायला दुडूदुडू धावत जातो.

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

संक्रांत!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्‍यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे. जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे.