Skip to main content

समाज

आय.आय.टी. व एन. आय.टी.---प्रवेश

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 03/03/2012 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
खाजगी अभियांत्रिकी कॉलेजचा दर्जा बराच घसरला असला तरी आय.आय.टी व एन.आय.टी यांचा दर्जा अजूनही चांगला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ८ नवीन आय.आय.टी.ना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात आता १५ आय.आय.टी व २० एन.आय.टी आहेत. आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी बारावीनंतर IIT-JEE ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच बनारस हिंदू विद्यालय(IT-BHU)/ आय.एस.एम.धनाबादमध्ये याच प्रकियेतून प्रवेश दिला जातो.एन.आय.टी.मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी AIEEE हि परीक्षा द्यावी लागते.

डेली सोप मालिका कशी बनते .

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 02/03/2012 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले. १ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते .

प्रेयर्स फॉर बॉबी

लेखक प्रसाद प्रसाद यांनी बुधवार, 29/02/2012 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती.

माझा देश

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 27/02/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश (१) मी लहान असतांना वाचलय या देशात सोन्याचा धुर निघायचा निर्मळ पाण्याचे झरे दुथडी भरुन वाहनार्‍या नद्या सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट दोघांच्या हि मनात लवलेष नाही द्वेष भावाचा माझा देश (२) कुठे गेला माझा तो देश मि शोधतोय त्याला आटलेले झरे आटलेल्या नद्यांचे भकास किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि मनातुन धास्तावलेला एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत राग, द्वेष, क्रोध,मत्सर.... कुठे
काव्यरस

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

" आज मराठी भाषा- दीन ! "

लेखक विदेश यांनी सोमवार, 27/02/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
काव्यरस