Skip to main content

समाज

फक्त लढ म्हणा !!

लेखक रमेश भिडे यांनी गुरुवार, 26/05/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची. ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत. . . आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०६

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 26/05/2016 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी ..

ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी बुधवार, 25/05/2016 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
cOMPLAINTS अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.

माझी ज्यूरी ड्युटी - ९

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 24/05/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या. आरोपीच्या वकिलाने असे म्हणणे मांडले की आरोपीला विनाकारण गोवले आहे.

वड्याचं तेल

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’ ‘नाही साहेब,...’ ‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’ ‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’ ‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’ ‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’ ‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’ ‘....’ ‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा !

उप संपादकाची व्यथा- असत्यं वद धनं चर

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/05/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले. तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले.

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

गाव दत्तक देणे आहे !!

लेखक नितिन शेंडगे यांनी शुक्रवार, 20/05/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुन्या काळा पासून दत्तक घेणे हा प्रकार आहे. राजे, सरदार किंवा अन्य तत्सम मंडळी ज्यांना मुलबाळ नाही किंवा मुलगा नाही(वंश किंवा गादी पुढे चालवन्यासाठी) ऎसे लोक दत्तक पुत्र घेत. त्याचा सांभाळ करत. पुढे जावून हेच दत्तकपुत्र मालक किंवा राजा होत... सध्याच्या युगात मात्र एक नविन फैशन आली आहे ती म्हणजे गाव दत्तक घेण्याची, आणि ती हिंदी चित्रपट सृष्टीत जरा जास्तच आहे.. एखादा चित्रपट येणार असेल तर त्याला नजरेसमोर ठेवून गाव दत्तक घेतले, श्रमदान केले ऎसे इवेंट केले जातात आणि मीडिया ही त्याला भरपूर प्रसिद्धि देतो. चला चांगले आहे, की लोक अजूनही समाजकार्य करत आहेत.

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!