Skip to main content

प्रवास

प्रवास

Published on बुधवार, 07/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी, रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो. कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात.
लेखनप्रकार

याद्या 5069

भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात

Published on मंगळवार, 06/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो. भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्‍याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच.
लेखनविषय:

याद्या 10300

दाभिळ टोक ते अर्थर-सीट... एक थ्रीलींग अनुभव

Published on सोमवार, 05/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत... "मास्तर, ३ घिसर द्या..." "पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..." "कुठ पर्यंत जाते मग?" "विहिर... त्यापुढं नाही जात..." काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार... "सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..." तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले...
लेखनविषय:

याद्या 9791

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

Published on शुक्रवार, 02/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

याद्या 9705

डोणे दार - आहुपे घाट

Published on मंगळवार, 29/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या वीकेन्ड्ला तिरंगी घाटात गेलो होतो. त्यावेळी यतिन नामजोशी याने काढलेले काही अप्रतिम फोटो टाकत आहे. बाकी तिरंगी घाटाबद्दल बोलण्यासारखे कमी आणि अनुभवण्यासारखेच अधिक आहे. नजर ठरत नाही असे उंच उंच कातळकडे, प्रचंड दमछाक करणारी खडी चढण आणि मढ्ची रामवाडी (कोकण) ते डोणे गाव (घाटमाथा) अशी चार्-साडेचार तासांची शरीराचा, मनाचा कस पाहणारी चाल. गेल्या महिन्यात वल्लींकडून या रुट्ची माहिती घेतली होती. त्यांचे आभार. Disclaimer - हे फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10509

मामाचा वाडा चिरेबंदी

Published on रवीवार, 27/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
गोमू माहेरला आली हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा असं गाणं लहानपणापासून ऐकलं होतं. माझ्या आजीचं (आईच्या आईचं) गाव राजापूर. आईच्या वडलांचं गाव वेरळ. त्यामुळे मी आणि माझे आईवडील हाडाचे मुंबईकर असले तरी भावविश्वात कोकण यायचंच. कधी आईच्या मामाने आणलेला फणस, तर कधी मला न आवडणारं कुळथाचं पिठलं. लग्नकार्याच्या वेळी एकत्र जमलेल्या लोकांकडून ऐकलेल्या गप्पा, होणाऱ्या अतिशय जवळिकीच्या ( पक्षी खोदून खोदून होणाऱ्या - पैसे किती मिळतात, इतकी वर्षं झाली तरी मूल का नाही वगैरे) चौकशा व भुताखेतांच्या गोष्टी - इतपतच कोकणाची माहिती. त्यात कल्पनाविश्वात भर म्हणजे गारंबीचा बापू, पुलंचा अंतू बर्वा वगैरे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11583

रोहीडा: बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड

Published on मंगळवार, 22/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
२० जूनला सकाळी कुठेतरी भटकायला जायचे ठरले आणी लगेच ठिकाणही ठरले ते म्हणजे भोरजवळील रोहिडा किल्ला बरेच दिवस तो करण्याचे मनात होते पण काही केल्या जमत नव्ह्ते. आज योग जुळून आला. आम्ही चौघे मित्र निघालो ते मित्राच्या चारचाकीने. सव्वा तासातच भोरपासून ८ किमी असलेली बाजारवाडी गाठली. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे अतिशय सुंदर असे गाव. गावापासून लगेच चढाईला सुरुवात होते. पावसामुळे हवेत मस्त गारवा पसरला होता. शेतं हिरवीगार झाली होती. काळे ढग मधूनच बाजूला सरकून निळाइचे दर्शन घडवत होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 13555