Skip to main content

प्रवास

प्रवास

Published on बुधवार, 07/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी, रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो. कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात. आजुबाजुला असणारे ईतर प्रवासी, त्यांची वेशभुषा, आचारविचार, बोलण्याची पद्धत, दिसणं, त्यांचे संवाद, खिडकीबाहेरुन दिसणारी चांगली वाईट दृष्य एक ना हजार गोष्टी. एखाद्या रडणार्‍या बाळाकडे पाहुन कीव यावी, तर एखाद्या भांडकुदळ बाईकडे पाहुन एकदमच हसु यावं, एखादा संवाद ऐकुन भुतकाळात जावं तर कधी एखादा निसर्गरम्य देखावा पाहुन प्रसन्न व्हावं. बस किंवा ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबली की चहाचे दोन घोट घ्यावेत, त्या नव्या ठिकाणच्या दुधा-पाण्याची चव घ्यावी, एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी हसुन २ शब्द बोलावेत, कधी जमलच तर चार टाळके जमवुन मस्त गप्पा माराव्यात. कंडक्टर किंवा ड्रायवर ला उगाच "अजुन किती लांब आहे/ किती वेळ लागेल" असे विचारावे. गाडीतल्या आतल्या बाजुला खरडलेली "संजय लव्ज शिल्पा" अशी वाक्य वाचावीत, कोरलेले बदाम, त्यातुन जाणारा बाण पाहुन हसावं. विविध रोग बरे करणार्‍या क्लिनिकच्या, पोट साफ करणारे चुर्ण, अस्सल सोने कुठे मिळते अशा जाहीराती पहाव्यात. प्रवासात गमतीजमती सुद्धा खुप घडतात. अशीच माझ्याबरोबर घडलेली एक गंमत. मी कॉलेजात असताना परिक्षा संपवुन घराकडे जायला रात्रीची १२ वाजताची बस पकडली. ५ तासांचा प्रवास, परिक्षेमुळे झालेलं जागरण झालेलं. पटकन तिकिट घेऊन एका खाजगी बसमधे बसलो (खाजगी बस स्वस्त असतात ना ;) ). बसल्या बसल्या झोप लागली. मधे चहापाण्यासाठी बस थांबली. मी झोपेतच उतरलो आणी सरळ वॉशरुमकडे गेलो. परत येऊन चहा घेतला, चहा अर्धा झाला असेल, मला एकदम जाणवलं की मला बसचा नंबर, रंग काहीच लक्षात नाहीये म्हणुन. चहाचा कप तसाच फेकला, ईकडे तिकडे नजर फिरवली, २०-२५ बसेस उभ्या होत्या. माझ्या खिशात बसचं तिकिट होतं, ते बाहेर काढलं आणी प्रत्येक बसच्या जवळ जाउन ड्रायवर, क्लीनर ला तिकिट दाखवुन विचारु लागलो की हे तिकिट कोणत्या बसच आहे म्हणुन. एजंट ने दिलेलं तिकिट, कोण ओळखणार?. प्रत्येक बस मधे जाऊन शोधाशोध करु लागलो, माझी बॅग बसमधेच ठेवलेली होती आणी त्यात बर्‍याच महत्वाच्या गोष्टी होत्या. कोणती बस जाणारी, कोणती येणारी काही कळत नव्हतं. मला घाम फुटला. शेवटी बसेस जिथुन बाहेर निघतात तिथे जाऊन थांबलो, बाहेर जाणार्‍या प्रत्येक बसला थांबवुन चेक करु लागलो. एका बसमधला क्लीनर मला पाहुन ओरड्ला "ओ भाइ किधर हो, कबसे होर्न बजा रहे है. चलो जल्दी अंदर" मी बसमधे बॅग पाहुन खात्री केली. त्याने मला कसे ओळखले देव जाणे, पण मग मी मात्र कानाला खडा लावला. बसमधुन उतरताना बसचा नंबर आणी रंग काहीही झालं तरी उतरण्याआधी लक्षात ठेवीन. :D अशीच एक छोटी गंमत. एकदा एक जाड्या विंडो सीट साठी खुप भांडला, "एजंटने मला विंडो सीट सांगुन तिकिट दिले आहे" असे म्हणुन. मला ड्रायवरने विनंती केली आणी मी माझी विंडो सीट त्याला देऊ केली. बस सुरु झाली. थोड्याच वेळात त्या विंडोसीटवर एसीचे लीक झालेले पाणी पावसासारखे गळु लागली आणी जाड्याचा अवतार पाहुन मी त्याच्यासमोरच मोठ्याने हसु लागलो. बाकीच्यांना कळताच तेही हसु लागले आणी जाड्याचे हसु झाले. =)) असा हा प्रवास, मी एक गोष्ट प्रवासात नक्की पाळतो. प्रवासात चीडचीड न करता प्रत्येक गोष्टीची मजा कशी घेता येईल हे पहावे. तुमच्याही काही गमती जमती असतील तर ईथे सांगा. :)

याद्या 5069
प्रतिक्रिया 28

मी बहुदा जगावेगळी असेन ... प्रवास म्हटला की माझी सगळ्यात जास्त चिडचिड होते. किती कष्ट होतात, ब्याग भरायची, सगळं सामान नीट आहे ना पहायचं, घरी आलं की हे सगळं सामान पुन्हा जागेवर लावून ठेवायचं आणि सगळ्यात कहर म्हणजे धातूच्या नळकांड्यात बसायचं. त्यातून हे नळकांडं हवेतून उडणारं असलं की आणखीनच हाल, त्यापेक्षा धातूच्या पट्टीवर धावणारं नळकांडं बरं वाटतं. एका जागेहून दुसर्‍या जागी जाणं मला फारच जिकीरीचं वाटतं. नळकांड्यात बसल्यानंतर झोप लागली आणि डायरेक्ट डेस्टीनेशनलाच जाग आली तरच मला प्रवास आवडतो. मलातरी त्यापेक्षा सायकलवरून किंवा चालत उंडारायलाच जास्त मज्जा येते. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नळकांड्यात बसल्यानंतर झोप लागली आणि डायरेक्ट डेस्टीनेशनलाच जाग आली तरच मला प्रवास आवडतो. माझा आत्तेभाऊ बंगलोरला उद्यान एक्सप्रेसमधे बसला, आय मीन झोपला. गाडी चालू व्ह्यायच्या आधीच. अगदी वरच्या बर्थवर होता. जरा वेळाने जाग आली. कोणतेसे स्टेशन आले म्हणून पाय मोकळे करायला उतरला खाली. कल्याण स्टेशन होते. तिथेच उतरायचे होते त्याला. :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीशी सहमत. सगळ्यात विमानाचा प्रवास एकदम बेक्कार. जेव्हा बाहेर बघावं (पहीली आणी शेवटची २ मिनिटं सोडुन) तेव्हा नुसता पिंजलेला ला कापुस. आणि मग एवढ्याश्या जागेत ८-९ तास आखडुन बसणं म्हणजे डोक्याला शॉट. त्यातल्या त्यात आगीनगाडीचा प्रवास बरा. जरा आजुबाजुचा देखावा तरी पहाता येतो. पण सगळ्यात जास्त आवडतो तो बाईक वरचा प्रवास.

In reply to by गणपा

बाईक आणि बाईका ... =)) हा अगदीच विक पॉईंट :) बाकी इमानात लै बोर होतं याच्याशी सहमत ... तिथंबी आमच्या ढांगा पुरत नाय =)) येयर होश्टेश गप्पाळु असेल तर बरं पडतं शक्यतो :) मी इमानात सारखं खायला प्यायला मागुन त्रास देतो त्यान्ला ;)

In reply to by टारझन

येयर इंड्याचं हैद्राबाद-मुंबै-फ्राफु-शिकागो जे विमान हल्ली चालवतात त्यांत चिक्कार लेगस्पेस आहे ... फक्त मागे रेलायला फारशी सोय नाही. बघ, भ्रमणगाथेसाठी हवं तर नंबर लावून ठेव. डोंबलाचा प्रवासाचा आनंद ... त्यातून आपल्या शेजारीच कोणी ढेरपोट्या, जाडी आला/ली की झालंच! "हिला कितीशी जागा लागणार" असा विचार करूनच बहुदा असले लोकं माझ्या सीटवर ओघळले की माझं डोकंच सरकतं! नाहीतर एखादी टिपिकल काकू ... जी टकळी सुरू होते ती आपल्याला झोपायलाही मिनतवारी करावी लागते, नाहीतर यांचं चबरचबर सुरूच!! माझे विमानातले त्रासदायक शेजारी असं आख्खं ब्लॉगपोस्ट लिहावं लागणार बहुदा! अदिती

हे बसचे कंडक्टर / क्लीनर वगैरे लोक चेहरे बरोब्बर लक्षात ठेवतात. रोजचं कामच त्यांचं ते. पण मी सहसा बसचा नंबर /नाव नीट लक्षात ठेवतो. किंवा मोबाईलवर क्लिक करून ठेवतो. :) मात्र अगदी दोनेक महिन्यांपूर्वी भल्या पहाटे बेळगाव स्थानकावर बस निघून गेली मला खालीच ठेवून. खूप धावपळ झाली माझी. शेवटी गाठली ती बस कशी बशी. कंट्रोलर साहेब खूपच चांगले होते तिथले. खूप मदत केली त्यांनी माझी. खिडकीवरून आठवले. माझ्या नात्यातील एकांचे असेच खिडकीवरून दुसर्‍या प्रवाशाबरोबर झाले. तो प्रवासी भांडून वगैरे खिडकीत बसला. उजवीकडची खिडकी. रात्री समोरून एक अवजड सामान घेऊन जाणारा ट्रक बसला घासला गेला. पत्रा फाटला. ट्रकमधली धारदर अवजड वस्तू पोटात घुसून तो प्रवासी खलास झाला जागीच. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

खिडकीवरून आठवले. माझ्या नात्यातील एकांचे असेच खिडकीवरून दुसर्‍या प्रवाशाबरोबर झाले. तो प्रवासी भांडून वगैरे खिडकीत बसला. उजवीकडची खिडकी. रात्री समोरून एक अवजड सामान घेऊन जाणारा ट्रक बसला घासला गेला. पत्रा फाटला. ट्रकमधली धारदर अवजड वस्तू पोटात घुसून तो प्रवासी खलास झाला जागीच सहप्रवासी तारी त्याला कोण मारी -रंगोजी

In reply to by रंगोजी

अगदी हेच आमच्या माहितीतल्या एका व्यक्ती बरोबर झालय. पण जे गॄहस्त वारले ते माझ्या कुटुंबाच्या माहितीचे होते. आता प्रवास. सीएस्टी डोंबिवली लेट लोकल प्रवास करणारे हमखास झोपुन जातात. स्टेशन गेल की जाग येते पण तोवर ट्रेन कल्याण कड असते. जर रिटर्न ट्रेन नसेल तर कल्याण ला स्टेशनवरच मुक्काम करुन हे लोक पहिल्या ट्रेन न पहाटे परत येतात. मुंबईत अगदी दर एक दोन दिवसांनी हम्खास ऐकलेली गोष्ट. प्रवास कधी चांगला कधी वाईट दोन्ही असतो. त्या त्या प्रवासाच आणी प्रवाश्याच नशिब!! लग्न मुहुर्ताचा दिवस होता. माझ्या क्लासमेटच लग्न. आम्ही बरेच जण परत येत होतो. पुरी बस अश्या लग्न अटेंड करुन परत चाललेल्या लोकांनी भरलेली. आमच्या समोर बसलेल्या ईसमान जरा चांगल्या पैकी हादडल असाव! एकदम त्यान डोळे फिरवले अन जी उलटी केली ती माझ्या मैत्रीणीच्या ओट्यात. अग आई ग्ग. तिला धुवुन काढे पर्यंत पुरे झाल. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

In reply to by स्पंदना

अगदी परवाची गोष्ट, उशीराच्या विमानाने दिल्लीवरुन आलो, कुर्ला स्टेशन गाठायला सव्वाबारा झाले... अंबरनाथ लोकल आली, लप्टॉप्चे बॅक्पॅक मांडीवर ठेवले, कपड्याची बॅग वर ठेवली आणी सरळ ताणुन दीली. सवयीने डोंबिवलीत जाग आली, खाली उतरलो, आणि पुल चढुन घरकडे निघालो.. डाव्या हाताला सावकाश ठाकुर्लीकडे जाणारी लोकल दिसत होती आणि अचानक विज चमकली, कपड्याची बॅग गाडीतच गेलीय... मग धावधाव, स्टेशन मास्टरचे ऑफीस, त्याने अंबरनाथला फोन केला, गाडी पोचली नव्हती, ति पोहचेतोवर थांबलो, नशिबाने तिथल्या हमालाने बॅग ताब्यात घेतली, मग फोनवर ओळख पटवणे... यात तिन वाजले... घरी जवुन कपडे बदलुन ५ च्या कर्जत गाडीने अंबरनाथ कारण तिथल्या आधिकार्‍याची वेळ संपत होती... सगळी रात्र आणी बक्षीसाचे १०० रुपये खर्चुन बॅग ताब्यात मिळाली.. पण रेल्वे कर्मचर्‍यांनी केलेली मदत लक्षात राहीली.

है स्साला , आपल्याला हे असले बस-यष्ट्यांमधले प्रवास आठवले की आठवतो तो त्रास ... आमच्या ढांगा काय त्या षिटांमधे बसतंच नाय बगा !! आणि खांदे शेजारच्याला इच्छा नसतांना ढुश्शे देत र्‍हात्यात ... बाकी बस विसरण्याचा प्रसंग नविन नविन मुंबै वार्‍या करु लागलो तेंव्हा झालेला... मधे हॉल्ट घ्यायला थांबतात ना ते .. तिथे उतरलो आणि बस वाल्यानं बस फ्युएल भरायला नेली .. नंतर मी ओरडलोय .. "अरे इधर की बस किधर है भई ? " असो ... बाकी बस प्रवासातला अजुन एक बॅडलक म्हणजे "एखादी सुंदर तरुणी नेमकी आमच्या आजुबाजुच्या सिट वर असते, आणि आमच्या सिट शेजारी असते एक तर ढम्मी आंटी माही तर आज्जी ... " साला ब्याडलक ब्याडलक म्हणावं ते किती ? :) - (प्रवासी) टारेश बसपळवी

विमानातला प्रवास बोरींग असतो मान्य, अशावेळी मी एखादं पुस्तक जवळ ठेवतो. प्रवासात त्रास हा होतोच, कारण आपल्याला रोजची सवय नसते, पण माझं लेखातलं शेवटच वाक्य पण तेच म्हणतयं - प्रवासात चीडचीड न करता प्रत्येक गोष्टीची मजा कशी घेता येईल हे पहावे ;) प्रवासाची फक्त पॉझिटीव साईड लिहिली आहे. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

प्रवासाची फक्त पॉझिटीव साईड लिहिली आहे.
प्रवासाला निघणे आधी पोट साफ करुन घेणे , ही गोष्ट एकदा एक जण विसरला होता =)) त्याची हालत पुणे ठेशण ते लोणावळ्यातला हॉल्ट .. ह्या दरम्याण जी झाली होती ... ती मी याची डोळा पाहिली =)) डोळे पाणावले होते लिटरली =)) बाकी उगा रडणारं केकटणारं पोरगं पाहिलं की मला त्याच्या दोन मुस्काडात ठेऊन द्याव्याश्या वाटतात .... साला थेटरात पिक्चर पहायला गेल्यावर पण तोच प्रकार ... इथे पैशे भरुन काय तो रुदाली राग ऐकायला येतो का आम्ही ? बरं एक बेनं रडलं की दुसरीकडुन दुसरं रडगं ... अगदी आमच्या गल्लीतल्या कुत्र्यांसारखं .. एक भुंकलं की दुसरा सुरू =))

In reply to by टारझन

टारू, दिल्ली दूर नही. उगा रडणारं केकटणारं पोरगं पाहिलं की मला त्याच्या दोन मुस्काडात ठेऊन द्याव्याश्या वाटतात अजून चार दोन वर्षात असं म्हणून दाखव. रेवती

In reply to by रेवती

तुम्हाला काय वाटलं, काकू? टार्‍या थोबाडात मारणार म्हणजे मारणारच. स्वतःच्या नक्कीच मारून घेईल तो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by रेवती

ममो सहमत आहे रे. मला तर सगळ्याच प्रवासात फुल्ल धमाल येते. बाकी टार्‍यालातर तिळं होणार असं ऑक्टोपस म्हणतोय. =)) -Nile

माननीय मर्राठमोळाजी, माननीय सदस्य मिसळपाव.कॉम आपला प्रवास छान आहे. आपल्याला दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या विचारांना साकार करण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्य सेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या प्रतिभावंतांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे. खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे. सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना.. आपला प्रवास सुखाचा होवो... :) आपलाच नाना उर्फ अवलिया. संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥ कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥

मी एकदा बोरीवली ते ठाणे एसटीने चाललो होतो. चिक्कार गर्दी होती. असेच मधे कोठेतरी एक बाई बसमध्ये चढली. बसमध्ये जागा नसल्याने उभीच राहिली. तिला उभी पाहून एक वेडसर म्हातारा चेकाळला..जाम आरडाओरडा केला त्याने..आज भारतात बायकांना उभे राहावे लागतेय,वगैरे वगैरे..कोणी काहीही बोलले तर तो म्हणायचा की "पण एक बाई उभी आहे त्याचा प्रश्न सोडवा आधी".. त्या बाईला तर खुपच ऑकवर्ड झाले होते. खरेतर तिला तसे उभे रहाण्याचा कसलाच त्रास होत नव्हता. लोकांनी आणि कंडक्टरने झापले तरी तो म्हातारा शांत झाला नाही. शहाणा स्वत:ची जागा तिला देत नव्हता आणि जे बसलेले होते ते सुद्धा आपल्याला जागा आहे ना मग कशाला काय बोलायचे, उगाच उठून त्या बाईला जागा द्यावे लागेल या विचाराने गप्प राहून मजा पहात होते. शेवटी आमच्या सुदैवाने ती बाई एके ठिकाणी उतरली. त्यानंतर थोडा वेळ तो म्हातारा शांत होता. पण दोन स्टॉपनंतर परत एक दुसरी बाई बसमध्ये चढली. त्या म्हातार्‍याचे तिच्याकडे लक्ष नव्हते तरी एका डामरटाने त्या म्हातार्‍याला ती पहा आणखी एक बाई उभी आहे असे दाखवले...मग परत तेच लेक्चर आणि तोच आरडाओरडा..अरे बापरे...हे टंकतानाच ते आठवून फार हसायला येतेय.. खादाडमाऊ

प्रवास आणि माझं वाकडं आहे. अगदी ३६ चा आकडा! एकतर बरेच दिवस प्रवासाला जायचं ठरत नाही. ठरलं तर दहादा माझ्यामुळेच क्यान्सल होतं. जर वेळेवर निघाले (बैलगाडीने किंवा विमानाने) तर वाहने तासन््तास लेट होतात. मला गाडी 'लागत' नाही पण दुसर्‍यला लागली कि मलाही मळमळू लागते. मी प्रवासाचे पुस्तक लिहायला हवे. बर्‍याच वर्षांपूर्वी एका मासिकात 'प्रवासात घेण्याची काळजी ' असा लेख आला होता, तो मी उत्साहाने वाचायला घेतला आणि सगळ्या माहित अस्लेल्याच गोष्टी सांगितल्या होत्या. विमान प्रवासात तर सगळे प्रकार झालेत. आम्ही भावंडे लहान असताना माझे आजीआजोबा वयस्कर होते आणि त्यांना वेगवेगळी तिर्थक्षेत्रं पाहायची असायची. आईबाबा त्यांना आणी आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांना घेउन वेगवेगळी तिर्थक्षेत्रं पालथी घालायचे. फार लहानपणी 'वैराग्य' आलं ते याचमुळे!;) आपल्याकडे तिर्थक्षेत्री जी अतोनात ;) स्वच्छता असते त्यामुळे तर डोळे बंद करून जिथे फिरता येइल तिथेच जावे असे अजूनही वाटते. बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे तर जिथे आम्ही जाऊ तिथे जे जे बघण्यालायक असेल ते ते बघायला नातेवाईक यायचे आणि मग वाईला असताना ७-८ वेळा महाबळेश्वर बळेबळेच पहावं लागलं. काका लोणावळ्याला रहात असताना सारखं लोणावळा लोणावळा असं पाहणं झालं. आता कोणत्याही हिलस्टेशनला नेलं कि मला वैताग येतो. कोकणातले काका सारखं तिकडची ठिकाणे दाखवून आणायचे. मला तर असं वाटतं माझं लहानपण जमिनिवर कमी आणि वाहनांमध्येच जास्त गेलय.;) ममो साहेब, यात कुठली हो पॉझिटिव्ह साईड बघायची? एक पुस्तक खरच लिहून होइल. रेवती

In reply to by रेवती

ममो साहेब, यात कुठली हो पॉझिटिव्ह साईड बघायची? एक पुस्तक खरच लिहून होइल.
हीच तर पॉझिटिव्ह साईड. एक पुस्तक लिहून होतंय हे काय कमी आहे की काय? निगेटिव्ह तर नक्कीच नाही!!! :)

In reply to by श्रावण मोडक

अरेच्च्या! खरच कि! आता घ्यावेच लिहायला! खीखीखी! चांगली टपली मारलीत मला....शुद्धीत येण्यासाठी!!;) रेवती

In reply to by रेवती

आम्ही भावंडे लहान असताना माझे आजीआजोबा वयस्कर होते काय योगायोग हो...... माझ्याही बाबतीत अगदी अस्सेच होते

४-५ वर्षाची असताना आम्ही मुंबईहून गावी चाललो होतो आणि लोणावळ्याला यष्टी थांबली...मी वडिलांबरोबर खाली उतरले. चिक्की घेऊन झाल्यावर मला गाडीत जाऊन बसायला सांगितले आणि माझ्या लक्षात नव्हत कोणती गाडी ते...मी चुकीच्या गाडीत शिरले आणि आई दिसली नाही म्हणून जे का भोकाड पसरलं...इकडे वडील गाडीत येऊन बघतात तर मी नाही...मग कुठूनतरी आरडाओरडा आणि माझं भोकाड ऐकू आलं...मग वडील आले आणि योग्य गाडीत गेलो... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

काय लोकहो? प्रवास म्हणजे काय सगळे वाईटच अनुभव आहेत काय? आणी प्रवास फक्त एसटीनेच केलेला आहे का? सहल पण करतोच ना आपण, कमीत कमी शाळेत तरी सहलीला गेला असालच, त्यात पण प्रवास असतोच की नाही. चांगल्या किंवा गमतीदार अनुभवांबद्दल लिहा ना. सगळेच आपले प्रवासाच्या नावाने ठणाणा करायलेत. एक नकारात्मक प्रतिसाद दिसला की झालाच तो संसर्गजन्य ;) असो, आणखीन एक किस्सा लिहितो. एका मित्राच्या लग्नाला सुमोमधुन ७-८ जणांची गँग निघाली होती. एका मित्राने भलं मोठं भरलेलं तंबाकु असलेलं पान खाल्लेलं होतं एसी चालु असल्याने त्याला बराच वेळ थुंकता आले नाही. पानाचा तोबरा झालेला तेव्हा त्याने काच खाली घेऊन पचकन सगळं एकदम थुंकला. गाडी तशी आरामातच चालु होती. थोड्या वेळाने एक सुंदर मुलगी स्कुटीवर गाडीसमोर आली आणी तिने गाडी थांबवायला सांगितली. आम्हाला वाटलं की याने पान थुंकलं ते तिच्या अंगावर उडालं असणार. तिने काही म्हणायच्या आत आम्हीच तिला सॉरी म्हंटलं, तर ती म्हणाली "सॉरी काय सॉरी. तुम्ही थुंकलात त्यावरुन माझी स्कुटी स्लिप झाली आणी मी पडले, आरसा पण मोडलाय." आम्ही खो खो करत हसत सुटलो. आजही हसायला येतं आठवलं की. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

पाण नक्की तमाखु चं होतं की केळ्याचं ? =)) आणि एवढा चिकट चिकट थुकायचं की स्कुटी घसरावी ? कसले रे घाणेरडे लोकं तुम्ही ? पानं खाऊन पचापच थुंकलं की स्वत:ला काय समजतो काय तुझा मित्र ?

In reply to by मराठमोळा

>>एका मित्राच्या लग्नाला सुमोमधुन ७-८ जणांची गँग निघाली होती....... ती मुलगी स्कूटी वरुन धडपडली.... तरी उठून सुमो गाठली??? -ध्येयहीन

आता तुम्ही आग्रहाच करताय म्हणून....एकदा लहान असताना पुण्यात मामाकडे गेलो होतो तेव्हा फिरून झाल्यावर सगळे मिळून पीएमटी तून रात्री घरी होतो तेव्हा एक माणूस फुटपाथवरून नागडा पळत असलेला पहिला...हा गमतीदार अनुभव होऊ शकतो का? कारण बशीतले सगळे जण फिदीफिदी हसत होते. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

काय दोन लायनीत संपवलं राव तुम्ही ? त्याच्या आग्रहाची लांबी पाहुन तरी सविस्तर लिहायचं ना ? :) कसा होता तो माणुस ? डिट्टेल वर्णन करा =)) =)) =)) (खातोय आता फटके पाध्यांचे ... पळा =)) )