Skip to main content

मुक्तक

जेव्हा अदम्य ऐसी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/02/2021 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अदम्य ऐसी निद्रा कवेत घेते आकाशभाषितांना ध्वनिचित्ररूप येते अंधार भिनत जाता भवताल स्तब्ध होते संवेदनांस अवघ्या व्यापून साक्षी उरते दिग्बंध सैल होती तर्कास काम नुरते कालौघ थांबतो अन् आभास सत्य होते अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो निद्रा अशी कृृृृपाळू अंकी तिच्या मी क्लांत मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत
काव्यरस

मुक्त

लेखक सरीवर सरी यांनी रविवार, 14/02/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..
काव्यरस

वाजवा रे वाजवा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 14/02/2021 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
वाजवा रे वाजवा.    'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले  बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी  बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे.

कहानी पूरी फिल्मी हैं!

लेखक चिनार यांनी शनिवार, 13/02/2021 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली.. त्यानिमित्ताने लिहिलेलं.. #CinemaGully #कहानी_पूरी_फिल्मी_हैं "राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे, म्हणून काय कोणी चालूच नये की काय!" ह्याच चालीवर आम्ही म्हणतो, 'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने! म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय! परमेश्वराने अफाट न्यूनगंड, अमाप वेंधळेपणा आणि अनंत निर्लज्जपणा देऊन जे फार कमी नमूने पृथ्वीवर पाठवले त्यापैकी आम्ही एक! आम्ही नव्हतो राजसारखे स्मार्ट, प्रेमसारखे लोभस अन राहूलसारखे आगाऊ!

आण्णामहाराज!!!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 12/02/2021 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम." "काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?" "कळवतो म्हणाले." "हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच." "हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?" "विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी" "कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?" "अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?" "काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?" "अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर?

काही अविस्मरणीय डायलाॅग ....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 06/02/2021 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात .... लोहा, लोहे को काटता है. सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है. सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है .. डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है. डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं कुत्ते, कमीने, मैं तेरा

गुरुवार गुंज आणि गुरू

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 28/01/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार गुंज आणि गुरु. वीज नव्हती, टिव्ही नव्हते ,त्या काळात गावात रात्री लवकरच शांतता होई.संध्याकाळी कामावरून घरी परतलेले लोक थकलेले असत.दिवे लागण झाली की थोड्याच वेळात जेवणखाणे आटोपून बहुतेक जण झोपी जात.रात्री आठ साडेआठचे सुमारास सगळीकडे चिडीचूप.कुठे पोथी,भजन वगैरे सुरू असे ते आणि दर गुरुवारी रात्री देशमुख गल्लीत 'दत्त पंचपदी 'होई,तेवढेच अपवाद.तिथे मात्र उशीरा पर्यंत जाग असे. ज्या घरी पंचपदी असे ते घर गॅसबत्तीने उजळून निघे. जेवणे आटोपून लोक रात्री आठचे दरम्यान पंचपदी साठी जमा होत. बैठकीत चौरंगावर दत्ताची तसबीर मांडून पुजा केली जाई.

कृष्णमयी.

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2021 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमयी ..... चकोर शाह ते टेकडीवरचे झाड पाहिलस? एकटच उभे आहे. कधी पासून माहीत नाही. मला आठवत तेंव्हापासून इथेच असतं .असंच आकाशाच्या कॅनवासवर सुकलेल्या फांद्यानी नक्षी उमटवत. याच्या फांद्याना हिरव्या गार पानांनी नटलेलं कधी पाहिलं नाही, की त्यावरची फळं तोडायला कुण्यामुलांन दगड मारलेला पाहिला नाही. नाही म्हणायला हिवाळ्यात कधितरी एखादा चुकार पतंग याच्या फांद्यात अडकतो. काही दिवस फडफडत रहातो.प्रेमात पडल्यासारखा फांदीला बिलगतो. इतका की झाडाला फुल आलंय असे वाटावे. एक दोन दिवसच. वारं आलं की तो पतंग सुटायची धडपड करतो. त्याच धपडडीत फडफडून फाटून जातो.