गो गोवा... भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार
हिवाळ्याचे दिवस होते. पुण्यात अजून म्हणावी तशी थंडी सुरु नव्हती झाली. अचानक एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये असताना माझा फोन झर झरला (vibrating mode). माझा जिवलग मित्र विन्या कॉल करत होता. कॉल घेतला की तिकडून आवाज आला, " Party कैसा हे तू ..." , विन्या. "मोजेमे..." मी. "Party, सब लोगा गोआ जानेका पिलाना कऱरे". अचानक मिळालेल्या सुखद धक्यातून सावरत मी त्याला म्हणालो की, " कधी जायचं ? आणि सोबत कोण कोण आहे?" त्यावर विन्या म्हणाला, "अरे बरेच दिवस झाले असं अचानक भयानक काही केल नव्हत म्हणून जेव्हा आज सगळे भेटलो तेव्हाच ठरवलं की गोव्याला जायच सगळ्यांनी" "अरे पण सगळे म्हणजे कोण?", मी.

असेच काहितरी सुचलेले- फोटो.

लेखनप्रकार
"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?" माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले. दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती. तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. असो म

आजकाल जुने हिंदी सिनेमे थियेटर मध्ये बघायला मिळतात का ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
२००० सालानंतर मी थियेटर ला जाऊन जुना हिंदी वा मराठी सिनेमा बघितला नाहीये... आजकाल पिक्चरचं आयुष्य थिएटरमध्ये फक्त १ वा २ वीकएंड एवढेच असते . हायस्कुल व कॉलेजला असतांना बच्चन , धर्मेंद्र , सनी देवल,मिथुन, नाना , अनिल कपूर ई . हिरोंचे कित्येक पिक्चर मित्रांबरोबर टॉकीजमध्ये बघायला जी मजा यायची ती मजा घरी कॉम्पुटर वर CDya बघण्यात नाहीच...

असेच काहितरी सुचलेले

लेखनप्रकार
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

मी आर्ची बोलत्येय.

काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

फिलिंग आवसमला

लेखनविषय:
काव्यरस
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....

सॉफिस्टीकेटेड

लेखनविषय:
लेखनप्रकार
सॉफिस्टीकेटेड ही दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी दादर पश्चिमला कॅमेरा दुरुस्तीसाठी गेलो होतो. तेथे प्लाझा सिनेमासमोर तृप्ती म्हणून एक उत्तम हॉटेल आहे. याचे मालक श्री भागवत हे आमचे तसे दूरचे नातेवाईक आहेत. परंतु ते सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. तृप्ती हॉटेल हे राजेंद्र आणि श्रीरंग हे दोन चुलत भाऊ चालवतात. ती जागा त्यांची वडिलोपार्जित असून त्याचा त्यांनी अतिशय सदुपयोग केला आहे. मी त्या हॉटेलच्या समोरून चाललो असतात श्री राजेंद्र भागवत बाहेर उभे होते. ते आमच्या कडून पैसे घेते नाहीत आणि कुणाकडून काहीही फुकट घेऊ नये ही आमची घरची शिकवण.

अकोला आणि अमरावतीचे कुणी मिपाकर आहेत का?

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्‍यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे. आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे. तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का? ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम. कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच. आपलाच, मुवि.

रत्नागिरी कट्टा.....

लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता. शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का?
Subscribe to मौजमजा