"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?"
कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण.
"नेमिची येई मग पावसाळा"
हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार.
मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच.
"घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं.
"इलो रे!