मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौजमजा

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

देवदत्त ·
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.

लहान मुलांचे उपद्व्याप

मनस्वी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहान मुले करमणूक तर करतातच, पण कधीकधी भयंकर उपद्व्याप करून सळो की पळो करून सोडतात. माझा भाचा आहे. तो घरात कोणी नसताना ब्लेडने बाहुलीचं नाक कापत होता. नाकावरून ब्लेड सटकून त्याच्या तळहाताला कापलं आणि रक्त यायला लागलं. मग त्याची आई रागवेल म्हणून त्यानी जखमेत फेविकॉल भरला. मग दुसर्‍या दिवशी पस होउन ठणकायला लागल्यावर बोंबलला आणि त्याच्या आईला सगळा प्रकार कळला!

एक चित्र..मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये..

स्वप्निल.. ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्रे काढण्याची खुप हौस..पण आळशी आणि वेळ..एकदा सहजच मायक्रोसॉफ्ट पेंट वर खालील चित्र काढले.. कागदावर काढायचे म्हणजे बराच वेळ पाहीजे..नेहमी डोळ्यांसमोर संगणक..त्यामुळे हा रीकामा उद्योग.. :) सांगा कसे आले ते?? स्वप्निल..

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?" कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण. "नेमिची येई मग पावसाळा" हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार. मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच. "घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं. "इलो रे!

मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त

धमाल बाळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या वार्ताहाराकडुन दिनांक २२ जुन स्थळ : भांबुर्डा २२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही. याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली.

हास्यतुकडे-२

आगाऊ कार्टा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता. ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.) बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या? ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?) बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला. ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?) बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली. ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?) बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली.

हास्यतुकडे - १

आगाऊ कार्टा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वगत म्हणजे मनातल्या मनात विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत. ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच. बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं.

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

भडकमकर मास्तर ·
लूज कंट्रोल... २००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक.. लेखक : हेमंत ढोमे दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे निर्मिती : समन्वय पुणे. या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी.. नाटकाचे कथासूत्र... तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०...