Skip to main content

मांडणी

अर्थपुर्ण घटना अर्थात Synchronicity

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.

अर्थपुर्ण घटना अर्थात Synchronicity

काही दिवसापासून काही तरी लिहावे असे वाटत होते. त्यानंतर काही लेखन मिपावर सादर केले. मात्र अनेक दिवस घोळत असलेला विषय “अर्थपुर्ण घटना आणि मानवी मन”. नैसर्गिक घटना कालातीत अशा शक्तिकडून कालात घडवल्या जाणाऱ्या योजनाबद्ध घटना असून त्या एखाद्या मानवी मनाच्या संबंधाने म्हणजेच अर्थपूर्ण रीतीने आणि एककालीय रीतीने घडतात. कार्ल युंग या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने अशा घटनांना ‘एककालीय घटनात्मकता’ असे नाव दिले आहे. (अशा एककालीय घटना मानवी मनाच्या संबंधानेच नेहमी घडत असल्यामुळे त्या सर्वच ‘अर्थपुर्ण’ च असतात.

श्रीकृष्ण वसुदेव यादव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 01/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिळपाववर रामायण-महाभारताच्या विविध अंगानी चर्चा होत राहाते. त्यातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या लीलांमुळे सामान्यजनांवर त्याच्या चरित्रातील विविधांगांची मोहिनी पडलेली जाणवते. अनेकांना लीला व अदभूतता सोडून श्रीकृष्णाच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाची माहिती मला नव्याने कळल्याचे जाणवले. ते मला भावले. कदाचित आपणालाही ते वाचायला रंजक वाटेल.

पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 30/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.

पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!

सायंकालची वेळ. दरवाजा उघडून बाईंनी बाबारावांना आत घेतले. हुप्प चेहरा पाहून काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नातवंडाला घेऊन त्याचा डॅड परतला. एका हातात चॉकलेट अन दुसऱ्या हाताने मोबाईलवरील कार्टून पाहात त्याने शूज उतरवले. ‘चार्वाकवादावरचा लेख पेपरात आल्याने सकाळी उसाही दिसणारे बाबाराव आत्ता रुसलेले का?’ असा मुलाने हात करून आईला प्रश्न केला. ‘काय की’ म्हणून त्यांनी तोंड फिरवले. ‘काय रे, ते शूज रॅकवर कोण ठेवणार? तुझा बाप?’ बाबारावांचा नातवावर राग निघाला. ‘काय झाले?’ म्हणत सुनबाईने रागरंग ताडला.

वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 29/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा vada बीड जिल्ह्यातील माजलगावतालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिवूâन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकNयांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाNया छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला.

वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 29/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा वाड्याचे प्रवेशद्वार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिकवुन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकर्‍यांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाऱ्या छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला.

स्थापत्य- एक कला भाग २

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 27/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं! -------------- प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर. 'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो.

मूठभर खजूर [उत्तरार्ध]

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मूठभर खजूर [पूर्वार्ध] http://www.misalpav.com/node/33374 मूठभर खजूर [उत्तरार्ध] मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?” “बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले! “मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!” मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या.

अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 22/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार बाळगण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Galileo Galilei (मराठी टंकताना पडलेला प्रश्न : "ग" वरचा अर्धचंद्र google मध्ये काही केल्या जमत नाही, काय करायला हवे ह

मी असा त्या बासरीचा सूर होतो

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 17/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे. सुरेश भट मी असा त्या बासरीचा सूर होतो! नेहमी ओठांपुनी मी दूर होतो! प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो! राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता... मी घरोब्याचे जुने काहूर होतो! तू किती केलास भेटीचा अचंबा.. भूतकाळाचा जणू मी धूर होतो! मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो! कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ? जीवनाला मीच नामंजूर होतो! तेवते आहेस तू पूजेत कोठे? एकदा मीही तुझा कापूर होतो! मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात. म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता, आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात म

स्थापत्य- एक कला

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली.