प्रतिकुल परिस्थीतीवर विजय मिळवण्याकरता लागणारे धैर्य , साहस आणि बुद्धी हा माणसाचा अंगभुत गुण असतो. युद्ध सदृश परिस्थितीत हा हाताला लागला तर विजय नक्की.
१९९९ साली कुक्कुट पालन क्षेत्रात मला ३ वर्ष झाली होती. ह्या ३ वर्षात मी रस्त्यापेक्षा मी लीटर्(शिटवडा)वर जास्त फिरलेलो होतो. मी जमा केलेला विदा हा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधे चर्चेचा विषय होता. हा विदा मी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकर्याना वाटायचो.
कोंबड्यानी खाल्लेले अन्न, प्राशन केलेले पाणी आणि बाहेरचे हवामान ह्यांची सांगड घातलेला विदा वापरल्यास शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायची.