Skip to main content

कथा

कुलदिपक भाग ४

लेखक विप्लव यांनी मंगळवार, 19/06/2018 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो. "अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले. " अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं. आणि मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात.

राजयोग - १३

लेखक रातराणी यांनी सोमवार, 18/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

कुलदिपक भाग ३

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 15/06/2018 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले काकूंना पेढे देऊन मेघा घरी परतत होती तोच तिच्या लक्षात आले की " अरेच्चा शर्मिष्ठेच्या घरी पेढे द्यायला तर विसरलेच की मी. काय वेंधळी आहे ना मी!" स्वत:शीच बडबडत मेघा आपल्या प्रिय बालमैत्रिण म्हणजेच शर्मिष्ठाच्या घराकडे वळली. " नलू काकू, शमू आहात का घरी?" दरवाज्यातून हाका मारत मेघा शर्मिष्ठाच्या घरात शिरली. दिवाणखाण्यातून आत जाताना काहितरी अस्पष्ठ कुजबूज तिच्या कानी पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत ती माजघरात गेली तोच खमंग तळणाचा वास तिच्या नाकात शिरला. " अहाहा काय खमंग वास दरवळतोय नलू काकू! काय तळताय चकल्या का?" " अरे ये ना मेघा आत. होय चकल्या करतेय बग.

राजयोग - १२

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/06/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहारेकऱ्यांनी निर्वासनासाठी तयार रघुपतीला विचारलं, "ठाकूर, कोणत्या दिशेला जाणार?" रघुपती म्हणाला, "पश्चिम दिशेला.." नऊ दिवस पश्चिम दिशेला प्रवास केल्यानंतर पहारेकरी रघुपतीला घेऊन ढाका शहराच्या जवळपास पोचले. रघुपतीला तिथे सोडून ते परतीच्या प्रवासाला लागले. रघुपती मनातल्या मनात म्हणाला, "कलियुगात ब्राह्मणाचा शाप फळणार नाही. आता बुद्धीनेच काम करायला हवं. बघूया तरी गोविंदमाणिकय काय चीज आहे आणि मी काय चीज!" त्रिपुराच्या सीमेलगत एका छोट्या कोपऱ्यात असलेल्या त्या मंदिरात मुघल साम्राज्याच्या बातम्या काही पोचत नसत.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 09/06/2018 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ?

आईचा मुलगा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

राजयोग - ११

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच दिवशी संध्याकाळी नक्षत्ररायला पाहताच धृव पळत पळत त्याच्याकडे गेला. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून आधी त्याच्या कपाळाला आपलं कपाळ लावलं. मग त्याच्या गालाला गाल लावून "काका!" म्हणत त्याला बिलगला. नक्षत्र त्याला म्हणाला, "छि. असं नाही बोलायचं. मी तुझा काका नाहीये." आजपर्यंत नेहमीच धृव त्याला काका म्हणून हाक मारत असे, आज अचानक नक्षत्ररायने त्याला दटावल्यावर धृवला आश्चर्य वाटलं. काही वेळ तो गंभीर चेहरा करून शांत बसला.

राजयोग - १०

लेखक रातराणी यांनी बुधवार, 06/06/2018 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहून जयसिंह म्हणाला, "तुला खरंच आपल्याच मुलांचं रक्त हवंय, आई? राजवंशातलं रक्त मिळाल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही? लहानपणापासून मी तुला आई म्हणत आलो, तुझी सेवा केली. इतर कुणाकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही. तुझी सेवा हेच माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे असं समजत आलो. मी एक राजपूत आहे, या धमन्यांमध्ये क्षत्रिय कुळाचं रक्त वाहतंय. माझे आजोबा राजा होते, माझ्या मामांचा वंश अजूनही राज्य करतोय.. राजरक्त हवंय ना तुला, मग घे हे.." जयसिंहने अंगावरची चादर काढून फेकली. कमरेला बांधलेल्या म्यानातून चाकू काढला. वीज चमकावी तसं क्षणार्धात त्यानं चाकू आपल्या हृदयाच्या आरपार नेला. मृत्यूची धारदार जीभ त्याच्या छातीला छिद्र पाडत गेली. जयसिंह मूर्तीसमोर कोसळला. पाषाणाची मूर्ती तसूभरही हलली नाही.

राजयोग - ९

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 05/06/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिरात कोलाहल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आषाढ चतुर्दशी होती. आजच रात्री मंदिरात चौदा देवतांची पूजा संपन्न होणार होती. सकाळी ताडाच्या झाडांमागून सूर्य उगवला तेव्हा आकाशात कुठेही ढगांचा मागमूस नव्हता. सोनेरी किरणांनी उजळून निघालेल्या मंदिराभोवतीच्या बागेत जयसिंह जाऊन बसला. लहानपणी त्यानं इथं घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनात रुंजी घालू लागले. याच मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर, इथेच गोमतीच्या घाटावर, या सुंदर बागेच्या थंडगार सावलीत त्यानं जो काही काळ घालवला होता, तो आता त्याला एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे वाटू लागला.

अनवट वाट ३

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 05/06/2018 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
" तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . " " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . " " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत .