Skip to main content

कथा

मी अजिबात घाबरत नाही....! - ३

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 15/10/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत मी पलाश मार्गावर पोचलो. तिची कार तिथेच बंद अवस्थेत उभी होती. माझ्या उरात धडकी भरली. मी जवळ गेलो आणि जीवात जीव आला. ती आत बसली होती. मोबाईल कानाला लाऊन. मी बाहेरून खिडकीवर मध्यमा आणि तर्जनीच्या पाठमोऱ्या बाजूने टकटक वाजवलं आणि ती चांगलीच दचकली. काहीतरी बोलली आनंदानी. मी तिला काच खाली घ्यायची खूण केली आणि तिने सरळ दार उघडून मला घट्ट मिठी मारली. घामाघूम झाली होती अक्षरश: "बरं झालं आलास. तुझा फोन का लागत नव्हता रे? किती घाबरले होते! बघ गाडी बंद पडली अचानक." त्या पक्याला मी सोडणार नाही. मागच्या वेळी माझी गाडी बंद पाडली.

काउन्टिंग (Counting)- शशक.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 15/10/2019 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे. एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी मग राग पळून जातो म्हणे... एक्क्याऐशी, ऐंशी .... ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं, सत्तर, एकोणसत्तर.. पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ? बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच. चव्वेचाळीस, त्रेचाळीस... तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा. हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती. चोवीस, तेवीस... मग? मला राग नाही येणार बाबांचा?

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....

दसरा आणी श्रीखंड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
आला दसरा............ दसरा आणी श्रीखंड दसरा आणी श्रीखंडा चे एक अतूट नाते आहे.. लहान पणी चक्का तयार करणे म्हणजे साधारण ३-४ आधी दिवस तयारी असायची. साय साठवणे ..व सा~याना पुरेल इतक्या श्रीखंडा इतके दही झाले कि मग ते एका फडक्यात बांघून ते भिंतीला टेकेल अश्या रितेने खुंटीला टांगले जायचे..ज्या मूळे त्यातले पाणी भिंत शोषून घेई व घट्ट चक्का बनत असे. पूर्वी भिंती भेनड्याच्या म्हणजे मातीच्या विटाच्या असायच्या.. सकाळीच चक्का व प्रमाणात साखर .. दुध घालून घोटणे सुरु व्ह्यायचे.. मग सहाणीवर दुधात जायफळ उगाळणे.

पेंन ड्राइव्ह

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
खूप छान व हॅण्डसम दिसतेस -बघत राहावेसे वाटते -प्रिया म्हणाली काहीतरी काय- साधा माणूस आहे -सरळ साधा संवेदना क्षम मनाचा तो म्हणाला म्हणून तर मला आवडतोस -प्रिया पण तुला माझी पर्वा नाही -प्रिया असं का बोलतेस ? तू ज्या ब्यांकेत काम करतोस तिथल्या क्लायंट्स ची लिस्ट माहिती मला हवी होती माझासाठी ते फार महत्वाचे आहे -माझं प्रमोशन -पगार वाढ सार त्यावर अवलंबून आहे -प्रिया त्या बदल्यात आपण लग्न करणार अशी तुझी ऑफर आहे -तो काहीतरी बोलू नकोस -ऑफर मला आली आहे -माहिती त्या बदल्यात प्रमोशन -पगार वाढ - आपण लग्न करणार कारण तू मला व मी तुला आवडतात म्हणून -प्रिया हो मंदसा हसला -तिच्या हातात पेंन ड्राइव्ह

मोठा मासा आणि छोटा मासा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 07/10/2019 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोठा मासा आणि छोटा मासा .. बारक्याने आपले घारे डोळे थोडेसे आणखीन बारीक केले. हातातील सिगरेटचा एक मोठा झुरका घेऊन तोंडाचा चंबू करून परत एक धुराचे वर्तुळ बाहेर सोडले. मग आपल्या केसावरून एकदा हात फिरवला. मग उगीचच शेजारी बसलेल्या ढापण्याला पाठीत एक गुद्दा ठेऊन दिला. ढापण्या पीत असलेल्या चहाच्या ग्लास मधून थोडा चहा हिंदकळून खाली पडला. नशीब त्याच्या अंगावर सांडला नाही. बारक्या एकदम हसायला लागला. त्याचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. मग त्याला एकदम ठसकाच लागला. सिगरेटचा धूर आपण बाहेर सोडायचा होता का आत घ्यायचा ?हेच त्याला समजेना आणि त्याचा ठसका परत वाढला.

मी अजिबात घाबरत नाही....! - २

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 04/10/2019 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू. तुर्तास महत्वाचे हे, की ती माझी सवय बनली आहे..... (की व्यसन?) तिला पाहिले नाही की रात्री निद्रादेवी सुद्धा माझ्यावर प्रसन्न होत नाहीत.

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 30/09/2019 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.

आमार कोलकाता - भाग २

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 24/09/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.