युगांतर-आरंभ अंताचा! भाग १२
भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले.
"माते.... आपण प्रकट का होत नाही?"
भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना.
" त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...."
भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते.
"आपण कोण देवी?"
"जिच्या इच्छापूर्ती करता तुम्ही गाय पळवून आणलीत, आर्य!
याद्या
1973
मिसळपाव