Skip to main content

कथा

N.H.4 (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 20/08/2019 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र बरीच चढली होती. चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती. अंधार दाटून आला होता. रात किड्यांच्या किर्र आवाजाने वातावरण भारून गेल होत. आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता. पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे नित्याचे असल्याने, ट्रक चालविताना तो बेफिकीर होता. त्याच्या चेहर्‍यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता. शांत शीळ वाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग त्याने पकडले होते. स्टेअरिंग डावी  उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती. तो मजेत वाहने चुकवित वेगाने मुंबईकडे निघाला होता. अठरा- एकोणीस वर्षाचा त्याचा क्लिनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता.

नभ मेघांनी आक्रमिले

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 20/08/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझे बोटीवरचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले. माझी मुलगी पुनव वैमानिक झाल्यामुळे (स्वीट टॉकरीणबाईचा 'पहिली फ्लाइट - जरा हटके! हा लेख तुम्ही वाचला आहेच.) तिचे अनुभव आणि या नव्या विश्वाबद्दल वेगळी माहिती माझं जीवन समृद्ध करत आहे. वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअर करीन. वैमानिकाच्या जॉबला ग्लॅमरचं वलय फक्त 'बाहेरच्यांना' दिसतं. स्वत: वैमानिकाला मात्र त्या आयुष्याचे वेगवेगळे आयाम अनुभवायला मिळतात आणि सोसायला लागतात. जर वैमानिक स्त्री असेल तर जास्तच. त्यात ग्लॅमरला अजिबात स्थान नसतं! प्रत्येकाच्या शरीराला एक ताल असतो.

द सियालकोट सागा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/08/2019 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

भित्यापाठी ब्रम्हराक्षस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 13/08/2019 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ------------------------------------------------------------------------------------------------ नदीकाठचं वातावरणच वेगळं असतं. त्याचं सौंदर्य दिवसा वेगळं भासतं तर रात्री वेगळं. दिवसा लोकांची लगबग चालू असते . आयाबाया धुणं धूत असतात . पोरं धबाधब पाण्यात उड्या घेत असतात ,डुंबत असतात . कुठे कोणी गुरं खंगाळत असतं . दिवसा लख्ख प्रकाशात नजर लांबवर जाते . कुठे एखादा चुकार खंड्या असतो तर कुठे बगळ्यांची माळ. पण नदीकाठचं वातावरण वेगळंच असतं; विशेषतः जेव्हा लोकांची गजबज नसते तेव्हा .प्रेमीजनांना तर फारच प्रणयरम्य भासणारं.

सावज (भाग १)

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 12/08/2019 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ================================================== " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ...

मी अजिबात घाबरत नाही.....!

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 04/08/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र! ऑफिस मधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठा काट्याने १२ वर येत ९ वर असलेल्या छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता. पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रध्दाळू नाही. त्यामुळे, अमावास्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते, असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे! आणि त्यात मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्ज्!

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

दोसतार - २३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/08/2019 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा :http://misalpav.com/node/44712
ज्ञानेश्वर माउली... ज्ञान राज माउली तुकाराम " त्यानी वारीत वारकरी नाचतात तशी पावलेही टाकली. त्यांच्या आसपासच्या दोन तीन वर्गांनी त्यांचे अनुकरण केले आमच्या सहलीला आता " शाळेची शिस्तीत निघालेली मुले, प्रभात फेरी , गणपतीची मिरवणूक, कुठल्याशा महाराजांची पालखी , आणि वारी" असे काहिसे संमिश्र स्चरूप आले होते. या घोषणांच्या नादात आम्ही गावाबाहेर कधी आलो आणि यवतेश्वरच्या हिरव्यागार रस्त्याला कधी लागलो ते समजलेही नाही.
यवतेश्वर तसे गावाच्या अगदी जवळचे ठिकाण.

राधी आणि मास्तर

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 30/07/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्‍या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.     त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.

खुलं मैदान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 30/07/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे. "साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली? "बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो. "गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला. "गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात." "चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.