Skip to main content

कथा

कथा - पिवळा गुलाब

केदार पाटणकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पिवळा गुलाब रवी कॉलेज पोर्चमधे पोचला. पोचताक्षणी कोप-यावरच्या गुलाबांनी रवीला वातावरणाची जाणीव करून दिली. कोप-यातल्या टेबलवर गुलाब विकायला एक तरूण बसला होता. रवी मुख्य आवारात पोचला. पहिला तास सुरु झाला. दुसरा संपला, तिसराही संपला. तासांना त्याचं लक्ष नव्हतं. आज वर्गात ब-यापैकी गर्दी होती. सगळे तास संपले. आज जेव्हा रवी वर्गात शिरला तेव्हा मनालीने त्याच्याकडे पाहिलं होतं. रवीनेही तिच्याकडे पाहिलं होतं. प्राध्यापक कॉमन रुममधे गेले. मुलंही बाहेर पडली. सगळ्यांची गर्दी त्या गुलाब विकणा-या माणसापाशी झाली. मुलं येत होती, गुलाब घेत होती.

सायकलचा प्रवास

श्रीगणेशा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९९७. पोलिस लाईन मध्ये राहणाऱ्या मित्राकडे किती भारी सायकल आहे याचं वर्णन बऱ्याच वेळा ऐकवून झालं होतं. एम एस ई बी तील दोन, वाड्याकडील आणि पेठेतील एक, अशा सर्वच मित्रांकडे एव्हाना सायकली अधून मधून दिसायला लागल्या होत्या. कधीतरी एखादी चक्करही मिळायची पण स्वतःची सायकल असली तर मनसोक्त हिंडता येईल असं नेहमी वाटायचं. झालं, शेवटी सायकल घेण्याच्या माझ्या हट्टाला घरातून हिरवा कंदील मिळाला आणि मग काय, सायकलच्या चर्चांना उधाण आलं. मित्र, शेजारी अशा सर्वांकडून माहिती गोळा करायला सुरुवात झाली. बी एस ए, हरक्युलस, ऍटलास, एम टी बी अशी नावं आपणच ठेवलीत, अशा थाटात चर्चा रंगू लागल्या.

आली आली गौराई

महासंग्राम यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

सच बोलू तो

Govind यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

बाप

Govind यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

पाचूंडी!

चिनार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाचूंडी ! पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट.. एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला. इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली.

वसूली

Govind यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो. मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.

पार्टी

Govind यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.

रुजवण

ज्येष्ठागौरी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
रुजवण अक्का गाडीत बसून अगदी दिसेनाश्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती.डोळ्यातलं पाणी निखळलं पूर्ण आणि मग ती आत वळली.उण्यापुऱ्या सात दिवसात काय जीव लावला ह्या बाईनं! म्हणायला गेलं तर आत्तेसासू पण सर्वार्थाने ह्या घरची एकमेव बाई.लग्न झाल्यानंतरच्या आठ दिवसात घरातलं पीठामिठासकट सगळं सगळं दाखवलं त्यांनी.आज त्या त्यांच्या घरी परत जाताना तिला लग्नाच्यादिवशी डोळ्यात आलेल्या पुराची आठवण करून गेल्या.आता तिला एकदम पोक्त वाटायला लागलं. घरात सासरे,नवरा,वीस वर्षाचा, तिच्यापेक्षा एखाद्या वर्षानी मागे एक दीर, आणि दहा वर्षांचे जुळे, आवळेजावळे दीर.

तपश्चर्या

माझिया मना यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का? असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले. त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली. ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला. ६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.