मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तपश्चर्या

माझिया मना · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का? असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले. त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली. ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला. ६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.

वाचने 20923 वाचनखूण प्रतिक्रिया 58

संजय क्षीरसागर 23/08/2020 - 01:42
१. वेळच्या वेळी पोलीस कंप्लेंट का केली नाही ? २. १६ व्या वर्षापासून आत्मनिर्भर असतांना ६४ वर्ष वाट कशाला बघितली ? ३. ते घर सोडून गेले म्हटल्यावर दिपा कुठून आली ?

In reply to by संजय क्षीरसागर

माझिया मना 23/08/2020 - 07:38
१. कंम्प्लेंट करूनही सापडले नाहीत. २. आत्मनिर्भर असणारे वाट पहात नाहीत का? ३. लग्न झाल्या झाल्या बायकोला सोडून नव्हते गेले, म्हणून दीपा आली.

In reply to by माझिया मना

१. सिक्स्टीनच्या बालिकेला अपत्ययुक्त करणं हा फौजदारी गुन्हा आहे. मिस्टरांना उर्वरित आयुष्य (पुण्यात असतील तर), डिएसके अँड फॅमिलीबरोबर काढावं लागेल. मग काय उपयोग एवढी तपश्चर्या करुन ? २. सध्या सिक्स्टीफोरची असूनही दिपा यंग कशी राहिली ? ३. आत्मनिर्भर ही फार उच्च स्टेट आहे. सरकारनी (इंडिरेक्टली) सांगितलं की आता करोनाच्याबाबतीत आत्मनिर्भर व्हा. सुटले की नाही लोक जीवाववर उदार होऊन ? आता कुणी मनकी बात ऐकत नाही आणि कधी दिसेल टिवीवर आपला तारणहार ? याची वाट बघत नाहीत. सो गिरीजा मॅम इज नॉट आत्मनिर्भर .

In reply to by संजय क्षीरसागर

@माझिया_मना तुम्ही लिहीत रहा. आम्हाला वाचायला आवडते आहे, आणि असले रिकामे प्रश्न पण पडत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

हा हा.. वाटलंच मला तुम्ही हे विचारणार म्हणून.. पण हा प्रश्न कथाबीजावर नव्हताच.. तो एका आभासी माणसाच्या आईवडिलांना उद्देशून होता.. कोण बरं असेल तो आभासी माणूस?

In reply to by संजय क्षीरसागर

स्पार्टाकस 24/08/2020 - 10:17
दुसर्‍या प्रश्नातल्या बेसिकमध्येच राडा आहे, कारण दीपा ८० वर्षांच्या सासूबाईना घेऊन आली आहे याचा अर्थ दीपा सून आहे, मुलगी नाही. अर्थात नीट लक्षपूर्वक न वाचता बाष्कळ प्रश्न विचारत सुटणं हा यूएसपी असल्यामुळे लेखक / लेखिका यांनी दुर्लक्ष करावे आणि लिहीत राहवे.

In reply to by स्पार्टाकस

संजय क्षीरसागर 24/08/2020 - 14:28
दीपा मुलगी आहे हे तुम्ही काढलंय ! मी फक्त `दीपा कुठून आली' असं विचारलंय. बाईंचे सुपुत्र ६४ चे आहेत. त्यांची पत्नी त्याच दरम्यान असावी असा अंदाजे, म्ह्णून पुढचा प्रश्ण आहे. पुन्हा एकदा वाचा ! _________________________________ अर्थात, प्रश्न मौजमजेचे आहेत इतकी सुद्धा समज, तिरकस प्रतिसाद देणार्‍यांना असू नये हे नवले ! लोक्स काय करतात कुठे तरी झालेला लोच्या कुठेही सेटल करायला पाहतात आणि मग पुन्हा तोंडघशी पडतात. काही जण तर केवळ स्वतःच्या अत्यंत अशुद्ध लेखनानं व्यथित असतात, मग स्वतःचं लेखन सुधारण्याऐवजी, काहीएक कारण नसतांना, त्याचा राग माझ्यावर काढतात ! असो, यातून धडा घ्या. उगीच व्यक्तिगत प्रतिसाद देऊ नका. कारण एकवेळ माहितीत चूकभूल होऊ शकते पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य. आणि या प्रोसेसमधे काहीही साधत नाही, पुन्हा कटुता वाढते. अर्थात, मी कुणाला ओळखत नाही त्यामुळे जसा प्रतिसाद तसं उत्तर हीच कायम पॉलिसीये, पण तुमचा कोच्या होतो, त्याची जवाबदारी मी घेऊ शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

असो.. ठीक आहे. तुमचे लॉजिक मानले. १.
सध्या सिक्स्टीफोरची असूनही दिपा यंग कशी राहिली ?
या विधानातील दीपाच्या वयाचा निष्कर्ष संदर्भासह स्पष्ट करा. २. त्यानंतर वेळ आणि लाज उरलीच, तर
१. सिक्स्टीनच्या बालिकेला अपत्ययुक्त करणं हा फौजदारी गुन्हा आहे. मिस्टरांना उर्वरित आयुष्य (पुण्यात असतील तर), डिएसके अँड फॅमिलीबरोबर काढावं लागेल.
आज ८० वर्षाच्या असणार्‍या सासुबाई १९५६ साली गरोदर राहिल्या. त्या काळी संमतीवय किती होते त्याचे पण थोडे ज्ञानतुषार उडवा. @संपादक - सदर आयडी जिथे तिथे आपले ज्ञानतुषार उडवत असतो, पण शक्यतो दुर्लक्ष केले जाते असे ध्यानात आले आहे. परंतु इथे १. काहीही कारण नसताना एका चांगल्या प्रयत्नावरती लेखकाची खिल्ली उडवणारे प्रतिसाद दिले गेले आहेत. २. काहीही संबंध नसताना राजकारण आणलेले आहे ३. इतर सदस्यांची वैयक्तिक अक्कल काढणारे प्रतिसाद दिलेले आहेत (समजा ते सोडुन देऊ.) परंतु १ व २ साठी सदर सदस्याला समज देण्यात यावे अशी विनंती आहे.

In reply to by आनन्दा

संजय क्षीरसागर 24/08/2020 - 16:42
आधी पल्टी मारली आणि आता एकदम स्वतःची लाजच घालवली ! १.वाचा : बाईंचे सुपुत्र ६४ चे आहेत. त्यांची पत्नी त्याच दरम्यान असावी असा अंदाजे, म्ह्णून पुढचा प्रश्ण आहे. २. अज्ञानाची परिसीमा थांबवा > संमतीचा प्रश्नच नाही : वाचा > Section 375 of the Indian Penal Code defines rape as "sexual intercourse with a woman against her will, without her consent, by coercion, misrepresentation or fraud or at a time when she has been intoxicated or duped, or is of unsound mental health and in any case if she is under 18 years of age." ३. आणि व्यक्तिगत प्रतिसाद देण्यास (पार लाज वगैरे) स्वतः सुरुवात केली आहे हे लक्षात घ्या. आता मुस्काडात बसल्यावर सैरभर होण्यापेक्षा, यातून काही तरी शिका म्हणजे पुन्हा अशी चूक होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 24/08/2020 - 19:21
हा हा.. शोभा कोणाची होतेय ते तुम्हीच ठरवा.. उगीच अहे कॉम्पुटर म्हनून काहीही टाकायचं आणि अंगाशी आले की दुसर्‍याची अक्कल काढायची हे नेहमीचे आहे तुमचे. फक्त तेहमी तुम्ही शब्दांचे खेळ करून निसटून जाता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्याच शब्दांमध्ये अडकला आहात. आणि धाडस म्हणाल तर मी कधीच आंधळी रिस्क घेत नाही. संमतीवयाचा कायदा माझ्या तोंडावर मारा आणि व्हा की मोकळे, नाहीतर तोंडावर पडला आहात हे मान्य करा.

In reply to by आनन्दा

संजय क्षीरसागर 24/08/2020 - 19:35
संमतीवयाचा कायदा माझ्या तोंडावर मारा ?
इंग्रजी वाचता येत असेल तर सेक्शनवर दिला आहे. अजूनही स्वतःची शोभा झाली आहे हे समजत नसेल तर चालू ठेवा.

In reply to by संजय क्षीरसागर

हा आजचा कायदा आहे.. लग्न 1956 ला झाले आहे.. तेव्हा किती होते संमतीवय ? मला इंग्रजी येत नाही, तेव्हा एखादी लिंक द्या, जिथे 1955 चे संमतीवय स्पष्ट लिहिलेले असेल, नाहीतर मी देतो बघा जमतंय का

In reply to by आनन्दा

संजय क्षीरसागर 24/08/2020 - 20:44
संमतीचा प्रश्नच येत नाही. पुराव्यादाखल प्रतिसादात संबधित भाग अधोरेखित केला आहे. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर कुणाकडूनही उपरोक्त सेक्शनचा अर्थ समजावून घ्या.

In reply to by आनन्दा

आनन्दा 24/08/2020 - 21:52
चला, आता हवेत विधान करणे बंद करूया, विकी असे म्हणतो की Child marriage was outlawed in 1929, under Indian law. However, in the British colonial times, the legal minimum age of marriage was set at 14 for girls and 18 for boys. Under protests from Muslim organizations in the undivided British India, a personal law Shariat Act was passed in 1937 that allowed child marriages with consent from girl's guardian.[6] After independence and adoption of Indian constitution in 1950, the child marriage act has undergone several revisions. The minimum legal age for marriage, since 1978, has been 18 for women and 21 for men. पुढे असेही लिहिले आहे की The 1929 law for non-Muslims was revised several times after India gained its independence from the colonial rule, particularly in 1978 when the marriage age was raised by 3 years each for men and women.[ हे विकी वरती घेतले आहे. मला अगदी तुमच्याइतके महान इंग्रजी येत नसेल, पण इथे जे लिहिले आहे, त्याचा अर्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे असा होतो, की 1978 पर्यंत संमतीवय 15 होते. 1978 मध्ये ते 18 केले गेले. तुमच्या इंग्रजीमध्ये जर काही वेगळा अर्थ असेल तर माहीत नाही. अजून एक ठिकाणी विकी असे सांगतो की Section 375 of the Indian Penal Code (IPC) considers the forced sex in marriages as a crime only when the wife is below age 15. Thus, marital rape is not a criminal offense under the IPC. Marital rape victims have to take recourse to the Protection of Women from Domestic Violence Act 2005 (PWDVA). म्हणजे संमतीवय सोडले तरी 15 वर्षाच्या पुढे होणारे वैवाहिक संबंध बलात्कार मानले जात नाहीत.. म्हणजे तुमचा दुसरा मुद्दा पण गैरलागू होतो. मग तुम्ही बलात्कार कशाच्या आधारावर म्हणत आहात? माझिया मना, कृपया क्षमा करा धागा हायजॅक केल्याबद्दल, पण हे केव्हातरी व्हायलाच हवी आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो.

In reply to by आनन्दा

संजय क्षीरसागर 25/08/2020 - 14:47
१.
24 Aug 2020 - 8:27 pm | आनन्दा मला इंग्रजी येत नाही,
असला खोटेपणा किती दिवस टिकणार ? असे उलटसुलट प्रतिसाद केवळ मानसिक असंतुलन दर्शवतात. २. न तुम्हाला कायदा माहिती न सोशल फोरमवर वागण्याच्या मर्यादा. तुम्ही लिहिलेलं सर्व आयपिसीच्या सेक्शन ३७५ मधल्या अंतर्विरोधामुळे झालं होतं आणि सुप्रिम कोर्टानं ते संपूर्णपणे बाद ठरवलं आहे. Sex with minor wife, despite consent, is rape: Supreme Court आणि याचं कारण The exception had remained an anomaly because Section 375 itself mandated that sex with a girl below 18 years of age, with or without her consent, was statutory rape. An unmarried girl child can prosecute her rapist, but a married girl child aged between 15 and 18 could not even do that, Justice Lokur said, pointing out the injustice. ३.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो ?
परत मुस्काडात बसली आहे. माझ्याशी तर सोडाच, पण कुणाशीही असला प्रकार पुन्हा करु नका. सहसा मी इतका खोलात जात नाही पण इतका निर्बुद्धपणा आणि अशी भाषा कुठेही सोकावता कामा नये.

In reply to by संजय क्षीरसागर

ठीक आहे, तो अंतर्विरोधाचा मुद्दा आपण सध्या मान्य करु. तसाही तो अस्थानी आहे. पण तिथे असे स्पष्ट लिहिले आहे की संमतीवय १९७८ साली वाढवून १५ चे १८ करण्यात आले. ते पण खोटे आहे का?

In reply to by आनन्दा

तसाही तो अस्थानी आहे ?
काय घंटा अस्थानी आहे ? पहिल्याच प्रतिसादात सांगितलंय की संमतीचा प्रश्नच नाही. तुम्ही सुप्रिम कोर्टाचा निर्णय वाचलेलाच नाही. तो निर्णय तुम्ही इकडून तिकडून गोळा केलेला सगळा कचरा रद्दबातल ठरवतो. सुप्रिमकोर्टाचा निर्णय हा अंतीम आहे त्यामुळे Sex with minor wife, despite consent, is rape: Supreme Court. विषय संपला. अजूनही कळत नसेल तर सोडून द्या. इथून पुढे : १. स्वतःला सोयिस्कर तेवढा कॉपी-पेस्ट मारलेला असा कचरा काहीएक उपयोगाचा नाही. माझ्यासारखी फुल लिंक देण्याची हिंमत ठेवा म्हणजे सगळा संदर्भ क्लिअर होतो. २. आपल्यात काहीएक वाद नसतांना तुम्ही सुरुवात केली आहे आणि त्याची फळं भोगतायं. स्वतः वातावरण बिघडवून परत वर कांगावा करत प्रशासनला साकडं घालण्याचा शहाजोगपणाही केला आहे. इंग्रजी येत नाही इतका उघड आणि बालीश खोटेपणा करुन तुम्ही आयडीची सर्व विश्वासार्हता गमावली आहे. तस्मात, तुमच्याशी चर्चा करण्यात मला काहीएक रस नाही. इथून पुढे तुमचे प्रष्ण तुम्ही सोडवा. याप्रकारे काहीही संबंध नसतांना उगीच वाट्टेल तसे स्कोर सेटल करणं आणि मुस्काडात बसल्यावर माझ्यावर आरोप करणं गैर आहे याची कल्पना तुम्हाला आणि असा प्रकार करणार्‍या इतर आयडींना यायला हवी. हा बायकी प्रकार आहे. जो मुद्दा असेल त्या धाग्यावर आणि समोरासमोर चर्चा झाली तर ती विधायक होते आणि विषय तिथेच संपतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 25/08/2020 - 20:43
ठीक आहे चर्चा करू सुप्रीम कोर्टाचा निर्णय 2000 नंतरचा आहे. आपल्या केसमध्ये शरीरसंबंध 1960 च्या अगोदर झाले आहेत. त्यावेळेस कोणता कायदा होता जे ज्यांवये तुम्ही याला बलात्कार म्हणताय इतका साधा प्रश्न मी विचारतोय. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळाटाळ करताय म्हणून मी उत्तर शोधून दिल, तर त्यातला अनावश्यक भाग घेऊन परत टिपण्णी केलीत. समजा मी आहे मूर्ख, आणि तुम्ही म्हणता मुस्काटात बसलेला, पण मग तुम्ही 1950 चा कायदा मारा ना माझ्या तोंडावर.. मी पन गाल लाल करून बसेन ना.. पण मला तो 1950 चा कायदा पाहिजे, 1978 च्या पुढचा नको, त्याने काहीही सिद्ध होत नाही. उगीच फुकाच्या तोंडावर पडणे आणि थोबाडीत बसण्याच्या चर्चा करू नका. खरी मारून दाखवा. गाल पुढे केला आहे.

In reply to by आनन्दा

चला - संमतीवयासाठो ही लिंक घेऊया - https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://egazette.nic.in/WriteReadData/1955/E-2210-1955-0035-101571.pdf&ved=2ahUKEwjz8Zfm1LbrAhU7yDgGHTDyA-EQFjAGegQIAhAB&usg=AOvVaw28SX14F4U5M_6kZzObpQW8 गॅझेट ची आहे, 1955 च्या हिंदू विवाह कायद्याची scanned कॉपी. तिथे मुलीचे वय 15 वर्षे असावे असे लिहिले आहे. गौरीच्या सासूबाईंच्या वय 16 होते. तुमच्या मते तो बलात्कार आहे. तुमच्या कायद्याची प्रत कधी देताय?

In reply to by कानडाऊ योगेशु

एखाद्या प्रश्नावर ते निरुत्तर झाले की ते अशी काही सुमडीत कल्टी मारतात की जसे काय त्यांनी त्या चर्चेत आपल्या आधीच्या दिव्य प्रतिसादातून दिव्य ज्ञान दिलेच नाही. इतरत्र मात्र कोडगेपणाने आपण स्वतःच शिवलेला सर्वज्ञाचा झगा घालून प्रतिसाद देत असतात. असा माणूस "आनंदी" असेल तर त्यात नवल काय.

In reply to by संगणकनंद

काय घंटा माहिती आहे तुम्हाला सेक्शन ३७५ आणि सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची ? नक्की काय परिणाम आहे त्या निकालाचा ? कशाप्रकारे सेक्शन ३७५ मधला अंतर्विरोध १८६० सालापासून दूर झाला आहे ? हिंमत असेल तर लिहा बरं इथे सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम. एकतर काहीही माहिती नाही, प्रतिसाद वाचायचे नाहीत, संदर्भ माहिती नाही, कधेमधे उगवलं की पुन्हा त्याचूपणा चालू !

In reply to by संगणकनंद

पुन्हा नांव सार्थ केलंत. बघा : एकतर काहीही माहिती नाही, प्रतिसाद वाचायचे नाहीत, संदर्भ माहिती नाही, कधेमधे उगवलं की पुन्हा त्याचूपणा चालू ! आता थोबाडात बसल्यावर दुसर्‍याकडे मदतीचा धावा !

In reply to by आनन्दा

स्पार्टाकस 24/08/2020 - 20:47
दीपा वयाने ६४ चीच असेल हे तर्कट कशावरुन? ती ३४ पण असू शकते. दुसरं म्हणजे ६४ वर्षांची असली तरी ती अ‍ॅक्टीव्ह असू शकते आणि टू-व्हीलरही चालवू शकते अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, त्यामुळे हा मुद्दाच बाद. लॉजिक गंडलेलंच असताना कोंडीत काय पकडणार डोंबल?

In reply to by स्पार्टाकस

१.
ती ३४ पण असू शकते.
चालू दे ! ३० वर्षाचं अंतर असणार्‍या किती जोड्या पाहिल्यात तुम्ही? दीपाचं वय ६४ च्या आत बसवतायं इतकीच काय ती तुमच्या लॉजिकची हद्द !

In reply to by महासंग्राम

संजय क्षीरसागर 25/08/2020 - 14:21
तर्काचा नियम असा आहे की Exception Proves the Rule ! थोडक्यात, अपवाद पुन्हा नियमच सिद्ध करतो. तस्मात, असल्या फालतू तर्काला काहीही अर्थ नाही. तार्किक दृष्टीनं तो बाद आहे.

कोहंसोहं१० 24/08/2020 - 01:58
छान कथा. बाकी फालतू प्रश्नांना भीक न घालता लिहीत राहा. काही अतिशहाणे आहेत इथे त्यांचा बैल रिकामाच राहणार. अगदी इथून ६४ वर्षांनी सुद्धा.
कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे. ६४ वर्षेपर्यंत धीर धरून वाट बघणे ही एक तपश्चर्याच आहे. ही शत-शब्द कथा आहे, असे मानून वाचली. आता शब्द मोजले तर ९४ निघाले (मोजण्यात चूकही झाली असेल) गंमत म्हणजे ६४ वा शब्द नेमका "६४" हाच आहे. तर्क तर्काच्या जागी, आणि भाव भावाच्या जागी. लिहीत रहा.
कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे. ६४ वर्षेपर्यंत धीर धरून वाट बघणे ही एक तपश्चर्याच आहे.
संपूर्णपणे सहमत. मला तर शबरीची गोष्ट आठवली. तसेच सहृदयी माणसांनी लेखक/लेखिकेला दिलेले प्रोत्साहनही भावले.
कथा, लेख असे तर काहीच म्हणता येत नाही याला. एक घटना सांगितली आहे, ती पण त्रोटक पणे.. रागाने किंवा भांडून छोट्या मुलाला आणि 16 वर्षाच्या बायकोला सोडून जाणाऱ्यासाठी वाट पाहणे म्हणजे तपश्चर्या नसून निव्वळ मूर्ख पणा आहे. बायका सोडणार्यांना किंवा दुसऱ्या बायको बरोबर पळून जाणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे तर येथे त्याच्या वाट पाहण्याला तपश्चर्या म्हंटले जाते.. अवघड आहे. उलट स्त्री ने असल्या नवऱ्याचे अस्तित्वच झुगारून दिले पाहिजे.. आणि दीपाच्या नवऱ्याने, जो स्वतः 64 वर्षाचा म्हातारा आहे, त्याने तर त्याला पुन्हा घरात पण घेतले नाही पाहिजे.. हाकलून दिले पाहिजे.. आणि एक काल्पनिक गोष्ट असेल तर ठीक आहे, पण भावना, संवाद, मनःस्तिथी यांचा कुठलाच लवलेश नसलेल्या आशयशुन्य गोष्टी वर वयक्तिक प्रतिसाद किंवा शेरेबाजी करणे चुकीचेच.. असो..

In reply to by गणेशा

अहो शतशब्दाकथा आहे ती.. आणि छान आहे कल्पना म्हणून.. पूर्वी अश्या अनेक बायकांच्या कहाण्या ऐकल्या आहेत. त्या काळाला आजच्या मापदंडावरती जोखणे चूक आहे.

In reply to by आनन्दा

गणेशा 25/08/2020 - 00:25
Oh ok. शतशब्द कथा असा उल्लेख नसल्याने, असे अर्धवट का लिहिले असेल असे मला वाटले.. अवांतर - बाकी मापदंड आजचा असला तरी अश्या अवस्थेत तेंव्हा स्त्री, मन मारून समाजासाठी जगायची.. कदाचीत ती आताही मन मारून जगत असेल.. पण या मन मारून खुडत जगण्याला तपश्चर्या म्हणणे म्हणजे, एका भिकाऱ्याला वैरागी म्हणण्यासारखे वाटले होते.. असो, माझा वरील रिप्लाय हा एक वाचकाला, भावना, संभाषण नसलेली गोष्ट वाटली.. शतशब्दकथा लिहिले असते किंवा मला कळाले असते तर शब्दमर्यादा समजल्याने रिप्लाय दिला नसता.. लिहीत रहा..

In reply to by गणेशा

चौकस२१२ 28/08/2020 - 04:57
+१
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस डोक्यावर पडलेला आहे याची खात्री झाली आहे. साध्या शतशब्दकथेचा आस्वाद घेण्याऐवजी त्यात मिठाचा खडा टाकण्याची विघ्न संतोषी वृत्ती पाहून करमणूक झाली

कोहंसोहं१० 30/08/2020 - 05:41
"कारण एकवेळ माहितीत चूकभूल होऊ शकते पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य" ---> हाहाहा.....आणि एका आयडी ने मनावर घेऊन बरोब्बर कोंडीत पकडलेच शेवटी. संक्षी, तुम्हाला वाटत असेल की तुमची चूक दाखवून दिल्यावर, तुम्हाला कोंडीत पकडल्यावर गोल गोल शब्दांचे सडे पाडून त्यातून निसटून जाता येते पण तसे नाहीये. लोकं तेवढेही मूर्ख नसतात. सर्वसामान्य वाचकाला सहज कळते की कोण कोंडीत सापडत आहे. अश्या वेळी चूक मान्य केली तर उलट त्या आयडी बद्दलचा आदर वाढतो. पण चूक असूनही मान्य न करता जिलब्या टाकून समोरच्याला गप्प करण्याचा प्रयत्न फक्त तुमची केविलवाणी धडपड दर्शवते. असे झाल्यास बऱ्याचदा इथे लोकं सोडून देतात. कारणे अनेक असतात, त्या खोलात जात नाही. पण हल्ली तुमच्या बाबतीत असे दिसते आहे की तुमच्या गर्विष्ठ आणि एककल्ली, दुराग्रही आणि फक्त मीच शहाणा या स्वभावामुळे अनेकजण मुद्दा शेवटपर्यंत लावून धरत आहेत आणि अश्यावेळी अनेकदा तुम्ही तोंडावर पडत असलेले दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बरोबरच असता हा फाजील आत्मविश्वास सोडा. कवी अनंत फंदी त्यांच्या प्रसिद्ध 'फटका' मध्ये म्हणतात - मी मोठा शाहणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको | एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको || जगात आपल्यापेक्षा कमी शहाणे लोकं असले तरी आपल्यापेक्षा जास्त शहाणेही लोकं असतात एवढे साधे लॉजिक जरी समजले तरी पुरेसे आहे. शेवटी विद्या विनयेन शोभते. एकदा तुमच्या मिथ्या अहंकाराचे ओझे बाजूला सारून तरी बघा. मस्त हलके व्हाल. आणि हो, सगळीकडे कोरड्या तर्काचे काटे फेकून मारण्याऐवजी प्रसंगानुरूप कलेच्या सुगंधाचाही आस्वाद घेत चला एवढेच सांगेन.

In reply to by कोहंसोहं१०

आजच्या युगात माणूस जसा चालेल तशी नदीच्या पाण्याची पातळी बदलत गेली. कालीमुळे पोट दुखी संपली इतकी टुकार विचारसरणी असलेल्यानं लॉजिकवर बोलावं हे एक आश्चर्य ! बाकी धाग्यातल्या सर्व प्रतिसादांना उत्तर दिलं आहे. धाग्या संबंधी काही मुद्दा असेल तर बोला. नाही तर इथले सो कॉल्ड डॉक्टर ज्यांना पेशंटची तपासणी केंव्हा करायची माहिती नाही, स्वतःचे कालचे प्रतिसाद आज आठवत नाहीत, सोनोग्राफीची आणि जिएसटी रिटर्न्ससारखीच म्हणतात, वर मलाच विचारतात की त्यांची सोनोग्राफीची रिटर्न्स पेंडीग आहेत का, आणि काही जमलं नाही की स्वतःची लायकी काढतात ! त्यांचे आणि तुमचे प्रतिसाद एकसारखेच. आता उगीच फालतू पचपच करण्यापेक्षा धाग्यावर बोला आणि हौसच असेल तर अक्कल घरच्यांना शिकवा.

In reply to by संजय क्षीरसागर

कोहंसोहं१० 31/08/2020 - 01:35
हाहाहा. सत्य झोंबले वाटते. पण जमल्यास शिका त्यातून काहीतरी. धाग्याविषयी मी आधीच बोललो आहे आणि कथा आवडल्याचा प्रतिसादही दिला आहे आधीच. जरा वाचत चला नीट. राहिला लॉजिक चा प्रश्न, तर तुम्ही तुमच्या निर्बुद्ध लॉजिकची पातळी 'माणूस मेल्यावर स्मृतीच्या स्ट्रिंग अंतराळात रेलेअसे होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूत पेस्ट होतात आणि आपण यालाच पूर्वजन्म म्हणतो' आणि 'माझा आयडी (मिपावर) ब्लॉक नसता झाला तर २०१९ मध्ये भाजप सत्तेवर आली नसती' अश्या आशयाच्या विधानातून आधी दाखवून दिलीच आहे आणि तोंडावर आपटला आहात. हाही धागा पुन्हा एकदा त्रयस्थपणे वाचून बघीतल्यावर तुम्हाला कळेल की "पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य" हा तुमचा माज एका आयडीने अत्यंत शांतपणे उतरवला आहे तोही पुराव्यासकट. एक सणसणीत चपराक तीही संयमितपणे. तुमचे लॉजिक गंडले आहे हे तुमच्या लक्षात येताच नेहमीप्रमाणे तुम्ही शाब्दिक हल्ले करून प्रतिसाद्कर्त्याला तुमच्याविरुद्ध बोलण्यापासून परावृत्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलात जरूर (उथळ पाण्याला खळखळाट फार) पण त्याचा परिणाम उलटाच झाला. अजूनही तुमच्या पराभवाची चरफड तुमच्या प्रतिसादातून दिसून येतेय. तुमचे हल्लेखोर प्रतिसादच सांगून जातात की तुम्हालाही तुमच्या गंडलेल्या तर्काची कल्पना आलेली पण तुमच्या अहंगंड मोठा भारी ज्यामुळे तुम्ही पुन्हा तोंडावर आपटून तुमची शोभा करून घेतलीत. तुमच्या लक्षात आलेच असेल तुमचा गर्विष्ठपणाच तुमचे किती नुकसान करतोय. म्हणून मी प्रांजळपणे तुम्हाला सल्ला दिलेला. अजून एकदा कवी अनंत फंदी यान्च्या शब्दात सांगतो- मी मोठा शाहणा गर्वभार हा वाहू नको......एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको बघा पटतंय का...

In reply to by कोहंसोहं१०

चौथीतल्या मुलाला सुद्धा पटणार नाही अशा गोष्टी आपण पब्लिक फोरमवर लिहितोयं एवढी सुद्धा समज नाही. स्वतः किंवा कुटुंबियांना आजारपण आल्यावर डॉक्टरकडे जाता का कालीच्या देवळात इतका साधा मुद्दा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या धारणा उध्वस्त करतो, तुम्ही काय घंटा लॉजिकच्या गोष्टी करता ? तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, पुनर्जन्माविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते वेगळा धागा काढून लिहा, तुमच्या धाग्यावर मी माझा अनफॉरमॅटेड मेमीरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो. तुम्हाला काहीही माहिती नाही आणि तुम्ही त्याविषयात काहीही लिहू शकत नाही तरी उगीच मुद्दा रेटतायं. धागा काय आणि प्रतिसाद काय एवढं तरी भान ठेवा. इथल्या सर्व प्रतिसादांना मी उत्तर दिलंय हे बघून तुमच्या थोबाडात बसली आहे कारण मला निरुत्तर करण्याचा प्रष्णच नाही. जिएसटीवर तुम्हाला काय माहिती आहे हे मागेच विचारले आहे. अर्थव्यवस्थेतलं तुम्हाला काय घंटा कळतं ? भरमसाठ वाढलेल्या किंमती आणि देशातली बेरोजगारी यावर तुम्ही मतदान करतांना काय विचार केला ? एफाअरडीआय बील आणून मोदी आणि जेटलींनी बँकेतल्या मुदत ठेवी, बुडीत अकाऊंट राइट ऑफ करण्यासाठी वापरण्याचा घाट घातला होता. तो पार्लमेंटरी कमिटीसमोर रिप्रझंटेशन करुन हाणून पाडला त्यात माझा सहभाग होता, काय घंटा कल्पना आहे तुम्हाला त्या बीलाची ? १.७५ लाख कोटी रुपये रिजर्व बँकेच्या गंगाजळीतून परस्पर हडपण्यासाठी मोदींनी ३ गवर्नर्स बदलले, काय विचार केला तुम्ही याचा बिजेपीला मत देतांना ? वरच्या एकाही प्रश्णाचं उत्तर तुमच्याकडे नाही, अशा अक्कलशून्य मतदारांनी केलेल्या निर्बुद्ध निवडीची फळं आज देश भोगतो आहे. थोडक्यात, तुमचा काहीएक अभ्यास नाही तरी मूर्खासारखे प्रतिसाद देतायं. आता हिंमत असेल तर (अस्थानी असतांना सुद्धा, कारण तो तुमचा निर्बुद्धपणा आहे) वरच्या प्रश्णांची उत्तरं देऊन दाखवा. नपेक्षा तुम्ही स्वतःची पुरती शोभा करुन घेतली आहे, इथून पुढे आपलं अज्ञान आणखी उघडं पाडू नका.

सुबोध खरे 30/08/2020 - 10:57
असं कसं असं कसं? मीच शहाणा आहे मी शहाणाच आहे मी शहाणा आहेच तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात?