Skip to main content

कथा

रुजवण

लेखक ज्येष्ठागौरी यांनी रविवार, 23/08/2020 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
रुजवण अक्का गाडीत बसून अगदी दिसेनाश्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती.डोळ्यातलं पाणी निखळलं पूर्ण आणि मग ती आत वळली.उण्यापुऱ्या सात दिवसात काय जीव लावला ह्या बाईनं! म्हणायला गेलं तर आत्तेसासू पण सर्वार्थाने ह्या घरची एकमेव बाई.लग्न झाल्यानंतरच्या आठ दिवसात घरातलं पीठामिठासकट सगळं सगळं दाखवलं त्यांनी.आज त्या त्यांच्या घरी परत जाताना तिला लग्नाच्यादिवशी डोळ्यात आलेल्या पुराची आठवण करून गेल्या.आता तिला एकदम पोक्त वाटायला लागलं. घरात सासरे,नवरा,वीस वर्षाचा, तिच्यापेक्षा एखाद्या वर्षानी मागे एक दीर, आणि दहा वर्षांचे जुळे, आवळेजावळे दीर.

तपश्चर्या

लेखक माझिया मना यांनी रविवार, 23/08/2020 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का? असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले. त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली. ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला. ६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.

हरतालिका

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 21/08/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

ती रात्र (भयकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 10/08/2020 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
ती रात्र (भयकथा) ते उपनगर हळूहळू पाण्याखाली येत होते. पाच दिवसांपासून संथपणे पडणारा पाऊस, आता मुसळधार बनला होता. सगळे उपनगर पावसाने झोडपले होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. रस्ते, मैदाने, इमारती, महामार्ग, हमरस्ते जलमय झाले होते. पाणी रस्त्यांच्या मर्यादा ओलांडून सखल भागाकडे वळू लागले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. चहाच्या रंगाचे ते पाणी सगळ्या मैदानात साचू लागले. हळूहळू मैदाने, सखल रस्ते, खोलगट जागा, इमारतींच्या खालचे मजले, तलाव, विहिरी पाण्याखाली येऊ लागल्या. एक एका भागात पावसाचे पाणी अतिक्रमण करू लागले.

राजयोग - २४ (उपसंहार)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २३ (अंतिम भाग) *** फकीराबरोबर असलेली ती तीन मुलं म्हणजे वेषांतर केलेल्या शुजाच्या तीन मुली होत्या. मक्केला जाण्यासाठी शुजा चट्टग्राम बंदरावर गेला मात्र वादळी पावसामुळे त्यादिवशी एकही जहाज निघाले नाही. वाटेत परत येताना, पुन्हा किल्ल्यात गोविंदमाणिक्यांची भेट झाली. काही दिवस किल्ल्यात राहिल्यानंतर सम्राटाचे सैनिक अजूनही शुजाच्या शोधात फिरत आहेत अशी बातमी आली. गोविंदमाणिक्यांनी आपले बरेच सेवक बरोबर पाठवून शुजाला त्यांचा मित्र असलेल्या आराकानच्या राजाकडे पाठवले.

राजयोग - २३ (अंतिम भाग)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 08/08/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २२ *** इकडे शाहशुजाला त्याचा भाऊ औरंगजेबाच्या सैन्याने सळो की पळो केले होते. इलाहाबादजवळ रणभूमीवर शेवटी त्याचा पराजय झाला. या पराभवाने अपमानित, भयभीत झालेल्या शुजाला आपले कोण आणि परके कोण यातला फरक कळेनासा झाला. वेषांतर करून तोही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लपतछपत पळू लागला. जिकडे जाईल तिकडे त्याला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शेवटी पटन्याला पोचल्यावर त्याने नवाबाचा वेष परिधान करून प्रजा आणि आपल्या परिवारासमोर येण्याची घोषणा केली.

शिक्षा (लघुकथा)

लेखक अभिरुप यांनी रविवार, 26/07/2020 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यापासून सतत बेचैन मनस्थितीत होता तो. काही समजत नव्हते त्याला. आपल्या भविष्याचे तारू कोठे जाणार हेच त्याला उमगत नव्हते. सततच्या बेचैनीला तो सुद्धा कंटाळून गेला होता. शेवटी काय होईल त्याला सामोरे जायचे असे मनाला सतत समजावीत होता. गेली तीन वर्षे नुसती फरपट सहन करत होता तो. असल्या जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटे त्याला. त्या मरणाचीच वाट पाहत होता तो. स्वतःचा खूप राग येत होता त्याला. "च्यायला, वैताग आलाय नुसता या जगण्याचा. " असे म्हणून पचकन थुंकला तो . आयुष्य कधी कुणाला कसे घेऊन जाईल काही सांगता येत नाही.

राजयोग - २२

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २१ *** नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.

अवेळीचा पाहुणा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 20/07/2020 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळीचा पाहुणा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली. एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली. बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता. बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दुध नको अशी चिठ्ठी लिहिली होती.घरातील सगळे नळ नीट बंद केले होते. उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठणाणा करत येऊ नये. आता संध्याकाळचे सात वाजले होते.

कथा: त्रिकोणाचे तिन कोन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 19/07/2020 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२ अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे. पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ.