मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

विहीर - माझ्या मनातील...

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बर्याच दिवसांनी आज गावाला निघालोय... तशी माझी दर महिन्याला चक्कर असायची गावाकडं, पण मागचे ६ ते ७ महिने काही जमलच नाही, मलेरियाने आजारी होतो आणि नंतर बराच वेळ अशक्तपणामुळे किवा कामामुळे जमलच नाही गावी यायला... खूप दिवसांनी आता सवड मिळाली म्हणून म्हंटल गावाला चक्कर मारावी, म्हातारीची ख्याली खुशाली पुसावी म्हणून निघालो. आमच गाव तस खूप प्रसिद्ध अस नाही... कोलवडी त्याचा नाव, तिथे जायच म्हणजे मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असा करावा लागतो..

सती - मला भावलेली कथा...

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचण्यात आल. "देवचाफा" त्याचं नाव. विद्याधर पुन्द्लीकांच हे लघुकथांच पुस्तक आहे. त्यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर आहेत. पण नुकतीच वाचून झालेली कथा "सती" तिच नाव, हि मला खूप भावली. हि कथा ज्या पद्धतीने लिहिली आहे त्यावरून जे जाणवत कि एखादा ताक्तीचाच लेखक अस काही लिहू शकतो. हि कथा भावन्याच कारण म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे. सदर कथा एक खूप नाजूक आणि धाडसी विषयावर भाष्य करते. ह्या कथेची रोचकता आणि सौंदर्य वाच्ल्याखेरीच समजणार नाही. हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे.

निरोप - तंबुला जसा दिसला!

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे.

अवंतिका बाईंची समाजसेवा

मनीषा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्‍या उतरून बागेत आल्या .