Skip to main content

कथा

स्वर्गमंडप...........खिद्रापूर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 14/01/2012 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.

त्रिशंकू

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/01/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिशंकू ! “जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला अजूनही चांगली आठवते. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडायची नाही. खरे तर आमच्या दोघांचेही व्यवसाय पूर्णपणे भिन्न.

सेवाभावातील मानसिकता

लेखक हरिकथा यांनी मंगळवार, 10/01/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही. एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.

मॅच

लेखक चाफा यांनी मंगळवार, 03/01/2012 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या सहामाहीत आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच घेतोय" सकाळच्या प्लॅनिंग मीटिंग नावाच्या टाईमपास सेशनमधे बॉसनं तोफ डागली. " आँ " " कसली ?" आणि काहीश्या चमत्कारिक आवाजात प्रतिक्रिया उमटल्या " आपण येत्या सहामाहीत पुण्यातल्या कंपनीच्या टीम बरोबर क्रिकेटची मॅच घेणार आहोत " बॉसच्या या निवेदनावर आमच्या गोटात उत्साह सळसळला. " मॅच स्टेडियमवर असेल, किमान पन्नास ओव्हर्सची आणि सीझन बॉलवर खेळायची आहे " उत्साह आणखी वाढला " आपल्याला ट्रेनिंग द्यायला एक प्रशिक्षक बोलावला आहे तो परवा येईल, त्याच्या बरोबर रोज किमान दोन तास सराव करणं गरजेचं आहे " उत्साह चरमसीमेला भिडला. " पण ते ऑफीसअवर्स नंतर " उत्साहावर पाणी पडल

मी आणि आमची गाडी

लेखक चाफा यांनी गुरुवार, 29/12/2011 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
"आहो, आज चार दिवस झाले, निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फोडायच्या प्रयत्नात होता. हा असा त्रागा गेले पंधरा दिवस माझ्या मागे चालू होता. म्हणजे गाडी घेतली त्या दिवसापासून. तो कुठला अशुभदिन होता कुणास ठाऊक हिच्या आग्रहाला बळी पडून मी नवीकोरी इंडीका घरी आणली. गाडी घरी आणली खरी पण इथे ड्रायव्हिंग येत कुणाला होतं! ड्रायव्हर ठेवणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आणि एकदा गाडी घरी सोडायला म्हणून आलेल्या मित्राला रोज रोज कसला हैराण करणार? मग गाडी तशीच पार्किंग मध्ये पडून होती.

दर्शनेच्छा बलियसि!

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 23/12/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं.