Skip to main content

जीवनमान

अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 24/08/2020 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
**************** सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार नजर मारली, खूपजण त्यांच्यासारखेच मोबाईलमध्ये गुंतले होते, तितक्यात अचानक एकजण उठल्यामुळे बसण्याजोगी ‘चौथ्या’ सीटची जागा झाली आणि तो बसला.

चुका

लेखक rushikapse165 यांनी गुरुवार, 20/08/2020 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्‍यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो. सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती

पुलंचा एक सुरेख लेख !

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 14/08/2020 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं. पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख. _______________________________________________ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही.

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 14/08/2020 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

संवाद (भाग २)

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 13/08/2020 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 10/08/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक.

संवाद

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 07/08/2020 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते.

अथ स्त्रीलीळा ।

लेखक आजी यांनी शुक्रवार, 24/07/2020 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/07/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 23/07/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.