पुलंचा एक सुरेख लेख !
लेखनप्रकार
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं.
पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख.
_______________________________________________
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.
विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील.
मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.
पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.
संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ.
त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.
कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.
पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.
माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.
मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली.
‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.
पु.ल.देशपांडे
(धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही..एक शुन्य मी’ या पुस्तकातून)
वाचने
20353
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
धन्यवाद
वा सुरेख लेख...
हे जुने लेखन
In reply to हे जुने लेखन by अनन्त्_यात्री
@ अनन्त्_यात्री : हे जुने लेखन
In reply to @ अनन्त्_यात्री : हे जुने लेखन by संजय क्षीरसागर
देशाला सर्व प्रष्णांपासून
आधी वाचलेला होता. पण परत एकदा
उत्तम .
व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
तुमचे हे मत तुम्ही त्यांना
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
व्यक्तीपुजा बाजुला ठेवा.
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
पुलंच्या लेखांकडे फक्त विनोदी म्हणून बघणे म्हणजे !
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
गंभीर लिखाण (पु. लं. चे)
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
तुमचा
In reply to तुमचा by मिसळलेला काव्यप्रेमी
.
In reply to . by Gk
.
In reply to तुमचा by मिसळलेला काव्यप्रेमी
पाहिले समजून घ्या
In reply to तुमचा by मिसळलेला काव्यप्रेमी
पाहिले समजून घ्या
In reply to तुमचा by मिसळलेला काव्यप्रेमी
पाहिले समजून घ्या
In reply to पाहिले समजून घ्या by Rajesh188
पटले नाही
In reply to पटले नाही by नेत्रेश
नेत्रेश
In reply to नेत्रेश by Rajesh188
Rajesh188
In reply to Rajesh188 by डॅनी ओशन
धन्यवाद डॅनी.
In reply to Rajesh188 by डॅनी ओशन
हम्म.
In reply to पटले नाही by नेत्रेश
फक्त दुसऱ्या महायुद्धात
In reply to व्यक्ती पूजा करणे बिलकुल पटत नाही by Rajesh188
दुर्गाबाईंनी एकदा पुलंना समज
या लेखावरून कदाचित असे वाटेल
त्यांच्या लेखात असे किती पॉइंट आहेत.
पुलंशी असहमत होण्याचा अधिकार आहेच
In reply to पुलंशी असहमत होण्याचा अधिकार आहेच by चौकस२१२
+१
In reply to पुलंशी असहमत होण्याचा अधिकार आहेच by चौकस२१२
'लेखाशी अनुसरून' ?
छान
हे वाचण्यात आले नव्हते, विचार
त्यानी
मस्त लेख !
फक्त ह्या लेखा पुरतेच माज मत मी व्यक्त केले होते.
In reply to फक्त ह्या लेखा पुरतेच माज मत मी व्यक्त केले होते. by Rajesh188
पु ल कशासंबंधी बोलताहेत ?
मार्क्स चा पुतळा लोकांनीच तोडला
... कारण मार्क्सचे विचार एककल्ली, आणि म्हणुन अपरिपक्व होते/आहेत
छान लेख... पहिल्यांदिच वाचला
.
चालू जि के तुमचा परत!
पू ल चे अनेक लेख आहेत
In reply to पू ल चे अनेक लेख आहेत by Rajesh188
त्यांचे मत
राजेश ...बरं असेल संक्षींचा
ते विनोदी साहित्य लिहतात तेच
In reply to ते विनोदी साहित्य लिहतात तेच by Rajesh188
अभिनंदन
पुलं, चार्ली चाप्लिन गाम्भीर्य ई
In reply to पुलं, चार्ली चाप्लिन गाम्भीर्य ई by चौकटराजा
काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार
In reply to काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार by शाम भागवत
@ शाम भागवत : काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार नाही ना?
In reply to @ शाम भागवत : काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार नाही ना? by संजय क्षीरसागर
_/\_
In reply to @ शाम भागवत : काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार नाही ना? by संजय क्षीरसागर
पुलंनी त्यांच्या पश्चात,
In reply to पुलंनी त्यांच्या पश्चात, by प्रसाद प्रसाद
@ प्रसाद प्रसाद : पुलंच्या नाटकांचे कॉपी राईटस
In reply to @ प्रसाद प्रसाद : पुलंच्या नाटकांचे कॉपी राईटस by संजय क्षीरसागर
एकूण स्पष्टीकरण असं आहे :
धर्मा वरून संघर्ष
In reply to धर्मा वरून संघर्ष by Rajesh188
@ Rajesh188 : एकमेव लॉजिकल प्रतिसाद !
हो ह्या मतावर ठाम आहे
In reply to हो ह्या मतावर ठाम आहे by Rajesh188
@ Rajesh188 : माझी मतं फार साधी आणि सरळ आहेत