रंगराज्य -३ सौ शहरी, एक संगमनेरी
मागिल एका लेखावर मित्राची प्रतिक्रिया होती "संगमनेर च्या मातीचा हा गुणच म्हणावा की काय जणू एखाद्या साहित्यिकाने त्याच्या शब्द संपदेच्या रक्ताने ही भूमी जणू काही हजारो वेळा शिंपडून तृप्त केली असावी त्यामुळेच तर तिथल्या गल्लीबोळात बालपण जगलेल्या तुमच्या सारख्या मित्रांकडून अशी काही साहित्यिक मेजवानी अनुभवावयास मिळते की....लाजवाबच....खूप सुंदर..."
तसं "कला" प्रकरण घरचंच, वडीलांनी हाती ब्रश धरायचं सोडुनही वीस हुन अधिक वर्ष झाली असतील पण शैक्षणिक क्षेत्रात असताना १९८७ ची स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव त्यानंतर किल्लारी भुकंपा सिरीजचे लाईफ साईज ऑईल पेंटींग्ज अजुन जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत.
मिसळपाव