Skip to main content

जीवनमान

तुलना नको!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 01/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?" हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल?

खोटं कsssधी बोलू नये!

लेखक आजी यांनी सोमवार, 01/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात प्रत्येकजण खोटं बोलतोच. कधी न कधी. खूप वेळा. काहीजण तर नेहमीच खोटं बोलतात. मीही अनेकदा खोटं बोलले. लहानपणी तर बरेचदा. "अमुक अमुक कुणी केलं? तू केलंस का?" ह्या आई-वडिलांच्या, मोठ्या भावाच्या प्रश्नाला मी नेहमी,"मी नाही बाई, कुणास ठाऊक, मला काय माहीत?"अशी खोटी उत्तरे दिली आहेत. "दुधावरची साय कुणी खाल्ली?"-"मी नाही खाल्ली. "इथलं नेलकटर कुठाय?"-"मला काय माहीत?" "ह्या डब्यातला सुई दोरा कुठं गेला?"-"मी नाही घेतला. शप्पत. मला माहीत नाही." खोटं बोलणारेच जास्त शपथा घेतात. तशीच मीही वारंवार शपथ घ्यायची. लहानपण सरलं. तारुण्य आलं, तशी खोटं बोलण्याची कारणं बदलली.

करोनाची लस : एक थोतांड

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 01/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

शेवटचा अश्रू

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 27/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

हे घे ते घे

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 23/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
हे घे, ते घे हे घे,ते घे हे जमव, ते जमव. अरे लागेल कधी तरी म्हणत, घरात मोठ्ठं भांडार वसव. भिंतीवर घड्याळे, हँगिंग्ज, चित्रे, लटकलेली आहेत जागोजागी. तरीही आणखी म्युरल्स हवीत, जुनी फोटोफ्रेमही थोडी जागा मागी. इंच नि इंच जागा लढवतो तरी आम्ही नवीन वस्तू खरीदतो. सागर किनारीचे शंख शिंपले, डोंगरमाथ्यावरचे दगडधोंडे, संमेलनातली असंख्य पुस्तके, मासिके-वर्तमानपत्रातील कात्रणे, हवीत यंत्र, तंत्र, विद्युत उपकरणे, हवीत देखभाली साठी मग अवजारे. त्यांच्या पावत्या, गॅरंटी, वॉरंटी ताप डोक्याला, हव्यात कशाला इतक्या कटकटी?

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 21/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 06/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत. ---------------------------------------------------- एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते. वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात .

आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 29/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना" चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले. शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले .... स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ... "गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे." बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....

आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर

लेखक मनस्विता यांनी रविवार, 24/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे. इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे.

यारों मैने पंगा ले लिया...

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 18/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.

यारों मैने पंगा ले लिया...

पेरणा चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.