Skip to main content

जीवनमान

सोनेरी (पिकली) पाने २०११

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/12/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता खच पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. पूर्वी सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे.

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.

एका लग्नाची............ (१)

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 26/12/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत (अर्थात काही चाणाक्ष मिपाकर ओळखतीलच ;) ) , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व ! कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते .... " राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे " " मुख्य तरुंगाधिकारी !! " " हा येडा झालाय ! " " चढलीय भें** ला ! " " माझी तर उतरलीच, अजुन क्वार्टर मागव ! " पार्टी ऐन रंगात आली होती, आणी राक्या ने प्रस्ताव टाकला की सुमति ला पळवायची !! सुमति !! साक्षात सुमति !!

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

"इजय असो"

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 21/12/2011 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.

मुला मुलींची नावे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 18/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही.

"निषेधकर्ता" च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 15/12/2011 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम मॅगझीन या साप्ताहीकाच्या दर वर्षाअखेरीस प्रसिद्ध केल्या जाणार्‍या "वर्षातली व्यक्ती" अर्थात "Person of the Year" ला खूप प्रसिद्धी मिळते. १९२७ सालापासून सुरू केलेल्या प्रथेमध्ये केवळ अमेरीकन व्यक्तीच, किंबहूना केवळ व्यक्तीच असते अशातला भाग नाही. १९८२ साली Machine of the year म्हणून संगणकाचे छायाचित्र आले (थँक्स टू अ‍ॅपल) तर १९८८ साली Planet of the year असे म्हणत प्रदुषणाने विनाशाकडे वाटचाल होऊ शकते या विचारांचे समर्थन करत "पृथ्वी"स पुढे केले होते.

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 15/12/2011 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला.

पावशेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/12/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात असताना नवेनवेच काही उर्दू शेर माहीत झाले होते. गृप मधल्या बहुतेक पोराना काहितरी हिंदीत दोन ओळी बोलायचे आणि त्याला शेर मानून त्या सगळ्या शेराना उगाचच वाहवाह देत बसायचे. हे सगळे आंखे दिल इश्क दामन आसू बादल हवा बारीश अशाच विषयावर असायचे. आम्हाला शेर तयार करायचे नियम म्हणजे यमक वगैरे कोणीतरी सांगितले. त्या महात्म्याने आम्हाला शेर दारु प्रेयसी या हमखास विषयावरच तयार होतात असे सांगितले. मग आम्ही दवा दिल दर्द जिगर आसूं ... यार असे बरेचसे शब्द गोळा केले. इंजिनिंरिंग चे असल्यामुळे की काय पण आम्हाला शेरांचे घाऊक प्रॉडक्षन करायचे होते.