Skip to main content

जीवनमान

कोचिंग क्लासेस -२

लेखक पैसा यांनी रविवार, 08/04/2012 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां.

निजेला लॅपटॉप

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 08/04/2012 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

डॉ. संजय ओक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 07/04/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

प्रार्थना.. आता एकच...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 05/04/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आ
काव्यरस

जुन्या पुण्यातला-जुना बाजार

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 04/04/2012 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार... ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्‍हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे.

हिताची निगा किती करावी?

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
. हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे. . हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.

काही नोंदी अशातशाच... - ९

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 02/04/2012 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
दहा दिवस झाले वास्तवात या गोष्टीला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा होता. पण त्याची हवा तयार होत गेली होती. या आंदोलनाचा, खरं तर आंदोलनामागील मागणीमागील विचाराचा, विरोधक हीच माझी त्या वर्तुळात प्रतिमा होती आणि आहेही. स्वाभाविकच ते सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा सुरू होती. चर्चा नव्हे, किंचित वादच. समोर एक वकील होते, त्यांचे दोघे-तिघे समर्थक, एक प्राध्यापक. भ्रष्टाचाराची कीड वगैरे शब्दप्रयोगांपलीकडे सारा विषय. त्यामुळे मुळात जनलोकपालाची गरज कशी आहे, त्यासाठी कायदा कसा झाला पाहिजे हे ते मला पटवून देत होते. म्हणजे, माझं मतपरिवर्तन करण्यासाठी नाही.

राम जन्मला गं सखे,राम जन्मला ।

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/04/2012 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
तर श्रोतेहो,आज जी राम-जन्म कथा परिचित करवुन देतोय,ती आहे एका वेगळ्या राम जन्माची... पिंपरी/चिंचवड महानगरपालिकेच्या इमारती मागिल P.M.T म्हणजेच परफेक्ट मशिन टूल्स कंपनीमधे हा रामजन्माचा कार्यक्रम(सोहळा नव्हे हो...!सोहळे रामाच्या नावा-वर निघालेली मंडळं करतात,भक्त नव्हे..!) गेली चाळीसएक वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे,त्याची...! ऐकुन तंसं फारसं काही विशेष वाटणार नाही,हो ना..? ''एखाद्या कंपनीत वर्षानुवर्ष एखादी पुजा होते काय..? आणी तीचं खास लिहावं,असं विशेष ते काय..?'' असा प्रश्न माझ्याही मनात आलावता खरा.