Skip to main content

चित्रपट

मॉडेस्ट रिसेप्शन

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 03/07/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅब्सर्डिस्ट परंपरेतलं किंवा ब्लॅक कॉमेडी प्रकारचं असलं काही मी कधी बघेन असा कधी विचारही केला नव्हता. पण पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि एनएफएआय यांनी आयोजित केलेल्या इराणी चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या 'मॉडेस्ट रिसेप्शन’ या अशा प्रकारच्या चित्रपटाने चक्क १ तास ४० मिनिटं खिळवून ठेवलं. त्यामुळे त्याबद्दल इथे लिहायचं धाडस करावं का असा विचार आला आणि तो जायच्या आत कृतीत आणायचा हा प्रयत्न आहे. मनी हाघीगी या इराणी दिग्दर्शकाच्या या चित्रपटात स्वत: तो(कावेह) आणि तारानेह अलीदूस्ती(लैला) ही अतिगोड चेहऱ्याची अभिनेत्री मुख्य पात्रे आहेत.

उडता पंजाब....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 28/06/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

उडता पंजाब....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 28/06/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

कांचीवरम

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 21/06/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

धुमसता पंजाब

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 18/06/2016 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य हे नागवे असते , त्याला कोणत्या कुबड्यांची गरज भासत नाही , ते कटू असले तरी पचवावे लागते, ते सुन्न करू शकते वा एखाद्यास पेटवून उठवू शकते. असे फार कमी चित्रपट असतात की ज्यांना सत्य घटनेवर आधारित अश्या कुबड्यांची व बुरख्यांची गरज भासत नाही , जे दाखवितात ते वास्तवच असते नि असे पडद्यावर दाखवण्यात आलेले वास्तव प्रत्यक्षात बदल (निवडणुकांतून ) घडवू शकते. नि असा बदल त्यांनी घडावावा ही पंजाबच्या जनतेकडून अपेक्षा!!!!! फार तत्वज्ञान न सांगतां मुद्द्यावर येतो. आजच " उडता पंजाब " मॅटीनी शोला पाहिला आणि चित्रपट आवडला.

'फुंथ्रू'..........

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी रविवार, 12/06/2016 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपट्स्रुष्टी हीच भारतीय चित्रपट्स्रुष्टीची जननी आहे यात कितीही वाद असले तरी ते सत्य आहे. बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. या मराठी चित्रस्रुष्टीचे आजपर्यंत तीन भाग पडतात- एक १९१३ ते १९८० चा काळ ज्यात विविध प्रयोग रसिकांसमोर येत होते. या बाबतीत तरी मराठी हिंदी चित्रस्रुष्टीपेक्षा पुढे होती. दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर २००४ साली 'श्वास' प्रदर्शीत झाला. तिसरा म्हणजे श्वासपासुन म्हणजे २००४ ते आज २०१६ पर्यंतचा काळ.

डिअर डॅड....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 10/06/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच गोष्टी या त्यांच्या साधेपणामुळेच आवडतात, मनाला भावतात. तो साधेपणा, ती सादगी मनाला कुठेतरी स्पर्श करते. चित्रपटांचही असच असतं. एकाच पठडीतल्या कथा, रंजकतेसाठी वापरलं जाणारं धक्कातंत्र, उगाचच घुसवलेली भडक द्रुश्य हे सगळ कितीही वेगळेपणानं मांडलं तरीही कंटाळा हा येतोच. या सगळ्यामधे एक साधी सरळ, अजिबात धक्का न देणारी कथा, शांत अभिनय असलेली आणि मुख्यातः गल्ला भरणे हाच मुद्दा नसलेली एक चित्रक्रुती जेव्हा समोर येते तेव्हा आपण पाहतोच. ती मनाला कुठेतरी अलवारपणे स्पर्श करते अगदी तो चित्रपट उत्तम वा उत्क्रुष्ट नसला तरीही...

स्पॉटलाईट

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 10/06/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट पटकन समजण्यात मी थोडी मंदच आहे. पिक्चर बघितल्या बघितल्या सिनेमेटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक इत्यादी गोष्टींबद्दल चर्चा करणार्‍यांबद्दल भयंकर आदर आहे मला. मला तर चित्रपटभर फक्त आणि फक्त कथा दिसत राहते. अतिशय चांगला चित्रपट असेल, तर एकसंध अशा कथेतून बाहेरच्या जगात आलं की एकदम हरवायला, बिचकायला होतं. काही दिवस ती कथा मनाच्या मागे रेंगाळत राहते, आणि मग एकदम कधीतरी अनपेक्षितपणे ती पूर्णपणे जाणवते. स्पॉटलाईटबद्दल झालं असं, की ती खरीखुरी घडलेली गोष्ट आहे हे माहित होतं. इतकंच काय, त्या बॉस्टन ग्लोबच्या बातमीबद्दल पेपरात वाचलेलंही आठवत होतं.

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 09/06/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच ना

पिस्तुल्या

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 08/06/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे. मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती. हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.