रम्य ते बालपण
त्यावेळी मी तीसरी चौथीत असेन.तेव्हा मी बोरीवलीला रहायचो.पाच पैसे,वीस पैश्याचे नाणे हातात घेउन पेपरमीटच्या गोळ्या,बोरकुट्,पोंगा(त्या पिवळ्या नारंगी नळ्या),जांबुलवडी(हे असत चिंचेच पण आम्ही त्याला जांबुलवडीच म्हणायचो),गुलाबजाम(कशाने बनवतात माहीती नाही,पण गुलाबी असत म्हणुन हे नाव्),रसना पावडर - ही हातात तळव्यावर घेउन त्यावर जीभ फीरवायची(मला कुणी हे खाताना पाहुन माझ्याबद्दल काय मत बनवेल ह्याची तमा मी बाळगत नसे,मंदीराच्या पाय-यावर बसुन माझे चालु असायचे,खाउन झाले की त्यावर ईतर काही न खाता थंड पाणी पियायच्,पोटात जाउन 'रसना सरबत' तयार होत,एवढी अक्कल तेव्हा नसेल पण अस करायला मजा यायची) आणि जलजीरा पावडर
मिसळपाव