Skip to main content

विरंगुळा

३-१३ आणि १७६० .......

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 08/06/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्लेमर =====> खालील लेख हा निव्वळ टाईमपास म्हणून लिहिला आहे. आमच्या एका गुरुंच्या कृपेने, आम्ही बर्‍याचदा (खासकरून शनिवारी रात्री) सुक्ष्मात जातो. गेली ३०-३२ वर्षे गुरु शोधण्याची खूप पराकाष्ठा केली. सुरुवातच फार दणक्यात झाली. आमच्या काकांच्या कृपेने घरात बाटलीबंद गुरु बरेच असायचे. काळ्या कपड्यातला चालणारा जॉनी, लाल कपड्यातला चालणारा जॉनी, पांढरा घोडा, सोनेरी गरूड हे त्यापैकीच. तसे हे सगळेच गुरु उत्तम पण हे रोज-रोज भेटायला आम्हाला भेटत नाहीत.असो..... पुढे लंडन मधील पिल्सनर येथे राहणार्‍या गुरुंची ओळख झाली.

कथुकल्या १०

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 03/06/2017 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
१. अपघात रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता. सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला. हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती.

नटनागर कृष्ण

लेखक शरद यांनी शनिवार, 03/06/2017 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नटनागर कृष्ण भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही.

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

संस्कृत उखाणे

लेखक शरद यांनी मंगळवार, 30/05/2017 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत उखाणे मराठीत असतात तसे संस्कृतमध्येही उखाणे आहेत. त्यांना म्हणतात " प्रहेलिका". आज ४ उदाहरणे देत आहे. सुरवातीला जरा सोपे संस्कृत बघू..नेहमीप्रमाणे एखादा दिवस सर्वांना विचार करावयास द्यावा. जे लगेच उत्तर देऊ इच्छितात्त त्यांनी मला व्यनि करावा. मी त्यांनी आधी उत्तरे दिली होती हे सांगेनच. (१) वृक्षस्याग्रे फलं दृष्टं फलाग्रे वृक्ष एव च !

कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 27/05/2017 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे ) --------------------------------------------- १. अमावशेची रात ( मालवणी ) “मजा आली का नाही.” “हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.” “आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.” “बरं बरं.” “सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?” “हडळीच्या माळावर” “एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.” “मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून.

पैलवान-१

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी. "....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!

परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

लेखक दिनु गवळी यांनी रविवार, 21/05/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते. आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता. तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते.

कथुकल्या ८

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 20/05/2017 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
१. शेवटची इच्छा "तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?" "चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात." झाडाच्या फांद्यांनी अलगद तोललेल्या आपल्या लाकडी घरातून त्या तिघांनी आवश्यक तेवढं सामान गोळा केलं. फळे, कंदमुळे, आजूबाजूच्या पाण्याने वाहून आणलेल्या मृत मासोळ्या थैल्यांमध्ये भरल्या. बाहेर गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा कहर माजला होता, विजा आकाशीचा नगारा बडवत गर्जत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने लहानमोठ्या झाडांना तर केव्हाच उपटून फेकून दिलं होतं.