यावर्षअखेरीस पुन्हा संकल्पांची जत्रा भरेल. सगळे उत्साहात नवनवीन संकल्प करतील. दिनांक १-जानेवारी-२०११ पासून काहीतरी खास नवीन करायला सुरुवात करायची असे मनाशी खूणगाठ मारून ठरवले जाईल. थोडा विचार करता आपल्या लक्षात असे येईल की संकल्प हे तीन प्रकारचे असतात. कुठल्याही गोष्टीचा, घटनेचा, समस्येचा तीन भागात विचार केल्यास आकलन नीट होऊन प्रश्न मार्गी लागतात असे काही व्यवस्थापन क्षेत्रातल्या तज्ञांचे मत आहे. म्हणजे "याचा विचार आपल्याला तीन मार्गांनी करावा लागेल..." अशी सुरुवात केली की आपली छाप पडलीच म्हणून समजा. खोटं नाही सांगत मी, खात्रीसाठी 'द मॅकन्सी वे' हे पुस्तक वाचा. असो.