Skip to main content

विरंगुळा

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

आता काळ, काम, वेग

लेखक शरद यांनी बुधवार, 21/11/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे कोडे घालण्याचा उद्देश आपण शाळेमध्ये शिकलेले सर्वच बरोबरच असते असे नाही एव्हड्यापुरताच मर्यादित होता. सर्वश्री अरुण मनोहर,राजेश व आनंद घारे यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी बाहेर पडण्याचा वेग दाबाच्या ( म्हणजेच पाण्याच्या उंचीच्या) प्रमाणात बदलतो. व सर्व पाणी बाहेर पडावयास फार म्हणजे फारच वेळ लागेल. साध्या गणीताने ह्याचे उत्तर काढता येत नाही व इंट्रिगल कल्क्युलसचा वापर आपण रोज करत नाही. द्या सोडून. व्यवहारतः साधारणपणे २० मिनिटे हे उत्तर. याचाच पुढचा भाग म्हणजे शाळेतील काळ, काम,वेग यांची उदाहरणे. टाकीत एका नळाने पाणी भरा व दुसर्‍या नळाने बाहेर सोडा अशी गणीते आपण सोडवत होतोच.

बघा उत्तर देता येते कां ?

लेखक शरद यांनी सोमवार, 19/11/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेदार कोडी आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्‍या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ?

केवढा चांगुलपणा असावा?

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 16/11/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुसर्‍यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुसर्‍यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 10/11/2012 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/11/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय?

धन्य ते गायनी कळा..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 06/11/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! ) या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से. मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे.

' एप्रिल फुल ?? '

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 01/11/2012 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांच्या भयानक मस्करीला बळी ठरलो होतो. संध्याकाळच्या बरोब्बर पाचच्या दरम्यान टाईम स्क्वेअरच्या पायर्‍यांवर जाऊन आजूबाजूची मस्ती बघत विसावलो होतो . एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख. अनायसे आलेला शनिवार. शनिवारि आम्हा भारतीयांचा छोटासा मेळावा ज्याला सोप्प्या इंग्रजीत गेट टुगेदर म्हटल जातं. शनिवार खास असायचा आमच्यासाठी .बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी न्युयॉर्क शहरातल्या भन्नाट गर्दीत ,आजुबाजुच्या झगमगाटात ,त्याच गर्दीचा एक भाग बनायचो आम्ही.मजा यायची .मस्त ग्रुप होता . सहा वाजत आले, पण कुणाचाच पत्ता नाही. फोनही उचलेनात कुणी. एक सोडला, दुसरा सोडला, 'अरे यार कुणीतरी रीप्लाय करा !

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

लेखक औदुंबर यांनी गुरुवार, 01/11/2012 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!