Skip to main content

विरंगुळा

<अवाक्षर>

लेखक लंबूटांग यांनी सोमवार, 21/01/2013 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोणालाही न पटणार्‍या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं. लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं. आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण? शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ? आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

निरक्षर

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 17/01/2013 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

गोड...काटा रुते कुणाला...!?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 14/01/2013 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे..

माझे ह्या वर्षीचे संकल्प

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 08/01/2013 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं क] संकल्प केले जातात. संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो. जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात.

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.

तुम्ही कोण होणार ?

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 01/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको ! पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले. तसेही अलीकडे पाळणे बघायला मिळणे कठीणच.