लेखकरेवतीयांनी बुधवार, 26/09/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?'
मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार!
लेखकस्पायांनी सोमवार, 24/09/2012 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/content/%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7
पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे ..
सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले ..
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप..
गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो ..
लेखकतिमायांनी गुरुवार, 20/09/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो.
लेखकविमुक्तयांनी सोमवार, 17/09/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली...
लेखकपरिकथेतील राजकुमारयांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी.