Skip to main content

विरंगुळा

माझा पहिला स्मार्टफोन्

लेखक चिनार यांनी बुधवार, 02/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत".

अशीच एक फँटसी..(२)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 31/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फँटसी..(१) सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.

विपश्यना साधकवीर परतले

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 31/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५ विपश्यना साधकवीर परतले दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?

प्रवास

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 28/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 26/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 26/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४4. 1 2 भगवान बुद्ध कमलासनावर ध्यानस्थ मुद्रेत ‘मी आत्महत्या करायला निघालोय.
....‘मी आत्महत्या करायला निघालोय. ...

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 25/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३ विपश्यना केंद्रात भुताटकी?
....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! ...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! … …. कोण? ...

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 23/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

अशीच एक फँटसी..(१)

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 21/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या. ..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.

ये क्या रे, घोडा बोला... फिर चतुर बोला... फिर घोडा....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील एक एक मजेशीर घटनांचा संदर्भ लावताना वात्रटपणाची उबळ येते. 1 पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून... आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते. नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते. बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार?