माझा पहिला स्मार्टफोन्
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत".
मिसळपाव
पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून...
आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते.
नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते.
बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार?