"काही नाही… "
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो…
त्या पैकी काही खालीलप्रमाणे…
कधी कधी… इशश्य…
कधी कधी… काही तरीच काय हो…
कधी कधी… आता शांत बसा…
कधी कधी…खाऊ कि मारू आता…
कधी कधी…अरे बापरे!!!
मिसळपाव

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.
“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.
“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?