Skip to main content

विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/10/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१४ हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू... =============== अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते.

नथ..................भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/10/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भा-३ नथ............भाग-४ वलिखान बाम्झाई....... ‘आमच्या धमन्यातून या स्त्रीचे रक्त वाहतेय’ हे वाक्य इस्माईलने म्हटले मात्र तेथे एकच गडबड माजली.

नथ..........भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ..........भाग-३ सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले) दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते.

"काही नाही… "

लेखक योगी_१९८५ यांनी गुरुवार, 09/10/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

नथ........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 08/10/2014 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?

गम्मत (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/10/2014 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली.

नथ........भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

ओम भवती भिक्षांदेही

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत. खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा. सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.) आता बाबांना काहीतरी दक्षिणा द्यायलाच हवी.