Skip to main content

विरंगुळा

"काही नाही… "

लेखक योगी_१९८५ यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

नथ........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?

गम्मत (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली.

नथ........भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

ओम भवती भिक्षांदेही

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत. खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा. सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.) आता बाबांना काहीतरी दक्षिणा द्यायलाच हवी.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 27/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

लेखक दशानन यांनी गुरुवार, 25/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
“कुठून सुरवात करावी?  कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा.  येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी.  कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते.  प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.