Skip to main content

विचार

देव पावला

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 27/09/2018 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
देव पावला मला जागरूक देवस्थानात जायला खुप भिती वाटते. शिरडी असो वा सिद्धीविनायक. मागे त्र्यम्बकेश्वर ला चार तास रांगेत उभे राहील्यावर दर्शनाच्या वेळी केवळ पैसे दिले नाहीत म्हणून हाकलूंन देणारा पुजारी आठवतो. पंढरपुर आणि तिरुपति बद्दल फक्त ऐकून आहे. अजून जायची हिम्मत झालेली नाही. मुद्दाम कबुल करतो की ही भिती देवाची नसून देवपण पांघरलेल्या पुजारी, भटजी, पंडित, गुरव, शास्त्री ह्यांची आहे. तूफान गरदीची आहे. देवाचे दर्शन म्हणजे देवाची मूर्ती पाणवलेल्या डोळ्यांनी साठवून घेणे आणि ती प्रतिकृति हॄदयावर झेरोक्स मारल्यासारखी छापून घेणे इतकीच माझी माफक अपेक्षा असते.

हिंदू खतरे में

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 25/09/2018 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी कुठलाही देश नसेल पण भारत हा एक असा देश आहे की जिथे हिंदू खतरे में आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे या देशामधे मुश्किल झालेले आहे. गणपतीचा उत्सव आला की स्पीकर्स लावायचे नाहीत. रस्त्यावर खड्डे खणायचे नाहीत. रस्त्याच्या मधे मांडव घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने हिंदूंवर घातली जातात. आता थोड्या दिवसात नवरात्र येईल. नवरात्रीच्या वेळेलासुद्धा हिंदूंच्या व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर बंदी येईल. नऊ दिवस हिंदूंनी दांडिया खेळायचा नाही.

मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/09/2018 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या १. एक प्रेमपत्र २. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . . ३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!! नमस्कार! मुलीच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या वाढदिवसानिमित्त तिला लिहिलेलं चौथं पत्र. ह्यामध्ये असलेले विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असतील व तसेच अनुभवही आले असतील म्हणून आपण सर्वांसोबत शेअर करत आहे.

" तेथे कर माझे जुळती ! ! "

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी रविवार, 16/09/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :- या संदर्भात नुकताच " TIME " ( २४ सप्टेंबर २०१८ चा ) या प्रसिध्द मासिकात आलेला एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेचे ३९ वे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची निवड झाली होती, ते माननीय श्री.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 16/09/2018 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 12/09/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

नं पाठवलेलं पत्रं

लेखक Pradeep Phule यांनी रविवार, 09/09/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं.

पिया तू अब तो आजा.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 08/09/2018 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
पिया तू अब तो आजा..... रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं  ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही. लता मंगेशकर हे भारताला पडलेलं एक नाजूक स्वप्न आहे; आणि आशा भोसले म्हणजे भारताचं चिरतारुण्य आहे!

गोपाळकाल्याच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 03/09/2018 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
गोपाळकाल्याच्या निमित्ताने  काल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली.

परग्रहावरील प्रेम रहस्यकथा भाग २

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 21/08/2018 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती ., क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले . अरे मयूर या माणसाजवळ थांबणे धोक्याचे आहे आपल्याला इथून निघून जाणेच योग्य ठरेल . असे बोलत ते निघाले ,.आपण पुढच्या वेळेस पूर्ण तयारीत या ग्रहावर येऊ खूप वेळ प्रवास केल्यावर ते एकदाचे आपल्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले .