मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भडकमकर मास्तरांनी 'साठेचं काय करायच?' ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला 'राजीव नाईक' ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला...
आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?
खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा?

बीबी का मकबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

बालपण सदैव नटवायचं असतं

बेसनलाडू ·
लेखनविषय:
उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली.

अनिवासी मोलकरीण

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का?

बाबा...

प्राजु ·
फादर्स डे च्या निमित्ताने... १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो. माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी?? आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले.

पूर आठवणींचा

जयवी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवणी साचलेल्या काळजात ओथंबलेल्या आठवणी पेटलेल्या होरपळून निघालेल्या आठवणी भरजरी मखमली पेटीत जपलेल्या आठवणी हळूवार अलगद हातांनी वेचलेल्या आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्‍या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्‍या आठवणी थंडीतल्या उबदार कुशीतल्या आठवणी पहाटेच्या गार गार वार्‍यातल्या आठवणी विरहाच्या पिळवटून निघालेल्या आठवणी भेटीच्या मोहरून निघालेल्या आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा जयश्री अंबासकर

"जीवन-मरण"

शा॑तेच कारट ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'जीवन-मरण' दोन भाऊ.. एक आयुष्याची सुरवात....एका शेवटाकडे. एक आयुष्याचा अ॑त.........पुन्हा नव्या सुरवातीकडे..

थोडंसं तूही समजून घे...

फटू ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सौमित्रा, कितीक युगे येतील अन् कितीक युगे जातील, काळाच्या प्रवाहात आदर्शवादाचे मानदंड बदलत राहतील परन्तू मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच मला दुनिया ओळखेल ...तरीही सीतेला एकटीला वनात सोडांवं लागणारच आहे थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या उमजून घे नुकताच श्वास मी घेतला होता या स्वार्थी मतलबी दुनियेमध्ये कळण्याआधीच काही, आईने सोडले मला वाहत्या पाण्यामध्ये कसाही अन् कुणीही असो मी, ही दुनिया दानशूर म्हणते मला ...तरीही नाही येता येणार मला आता पांडव भावांच्या बाजूला थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे असंख्य धडका मारल्या असतील बाळा या अवाढव्य सह्याद्रीला कित्येक वेळा नमवल

माणसं अशी का वागतात?

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नात्यात असली एकमेकाच्या, तरी गोत्यात आणतात मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात? लहानगे भांडतात, क्षणात विसरुन एक होतात मोठेपणीच हेवेदावे, मनात धरुन का ठेवतात? वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? परक्यांना जवळ करतात, कारण मोठी ठरतात कळत नसणार का त्यांना, आपल्यांत खोटी ठरतात? मानभावी वागत जातात, संभावित जगत जातात, त्याचा अर्थ असा नव्हता, असं कसं म्हणत राहतात? वर्षामागे वर्षे जातात, प्रेमाचे बंध विरुन जातात मनामधे मरत मरत अशी कशी झुरुन जातात? कुणाची गरज नाही, तेच मग ठरवून ठेवतात इकडे तिकडे चौकशी कशी बरं करत रहातात? दारातही मरणाच

मजेशीर शब्द

आर्य ·
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.