Skip to main content

विचार

पाडव्याची साडी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 03/08/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेतील पत्रांचा परीचयः मोहनराव आणि विणाताई : मध्यमवयीन .४७ ते ५० दरम्यानचं वय. संजय आणि निलू : मुलगा आणि सून जनरल :पैचान कौन? तशी घराघरात घडणारी कथा .पण निसर्गाला थोडसं गृहीत धरण्याची चूक कोण करत नाही ? वयाचा आडपडदा निसर्ग ठेवत नाही हे खरं एक छोटीशी चूक किती मोठं रूप धारण करते हे सांगणारी कथा. या कथेतील डी&सी चा अर्थ गूगलवर बघावा.----------------------------------------- मोहनराव : हे आक्रीतच.

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

मी आणि श्रावण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/07/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची. कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला.

नातं...

लेखक दशानन यांनी मंगळवार, 28/07/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... ! देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे. ठीक, अर्धे तरी दे. ठीक आहे हे घे... ! आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची..

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

तुर डाळ

लेखक पर्नल नेने मराठे यांनी मंगळवार, 28/07/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले. :S आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा :-? चुचु

रोगप्रतिबंधाच्या धोरणातला प्राधान्यक्रम

लेखक धनंजय यांनी सोमवार, 27/07/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लूच्या संदर्भात जो धागा निघाला, त्याच्या प्रतिसादात हा उपविषय निघाला. त्याबद्दल हा वेगळा धागा काढत आहे. त्या धाग्यात श्री. नितिन थत्ते यांनी विचार केला की वेगवेगळ्या रोगांना पायबंद घालण्यासाठी काय प्राधान्यक्रम द्यावा? हा प्रश्न खरोखर गुंतागुंतीचा आहे, आणि भावनिकही आहे. प्राधान्यक्रमासाठी काही निकष पुढीलप्रमाणे १. मृत्युदर : ज्या प्रमाणात रोग घातक (मृत्यूचे कारण) असतात, त्या प्रमाणात प्राधान्यक्रम असावा, असा एक विचार कित्येकांना सुचतो.

फिरस्ता

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 26/07/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी सकाळची वेळ, अंदाजे साडेपाच ते पावणेसहा. मला जाग आलेली होती, पण अंथरुणात लोळत, परत एकदा अनावश्यक सुलतानी झोपेच्या प्रतिक्षेत होतो. तेवढ्यात कानावर खड्या, खणखणीत आवाजात घराच्या बाहेरून एक लकेर ऐकू आली. अबीर गुलाल उधळीत रंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग भजन ओळखीचे होते, पण लावलेली चाल ओळखीची नव्हती आणि भजनाला दिमडीचा ठेका धरलेला होता. मी बिछान्यातून ताडकन उठून कोण गातंय, बघायला बाहेर आलो तर शेजारच्या सोसायटीच्यासमोर एक नाथपंथी जोगी भजन म्हणंत उभा होता.