Skip to main content

विचार

महिला दिन ( आमचे मनोगत )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 10/03/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिन आम्हाला मक्याचे सातच्या आत घरात ह्या सिनेमातील वाक्य आवडते. ''दिवस कसले साजरे करतात आज अमका दिवस आपल्यात दिवस कधी घालतात ........'' एक दिवस महिला दिवस तोही आंतराष्ट्रीय म्हणून आपण पण साजरा करायच्या म्हणजे काय तर एकमेकांना अभिनंदन करायचे . सावित्री फुल्यांची जयंती कितीजणांना माहीत आहे (मला माहीत नाही .) ''एक स्त्री शिकली तर सारे घर साक्षर होईल .'' हा संदेश देशात पोहोचला का ? ''त्यांच्या राज्यापेक्षा केरळमध्ये महिला साक्षर आहेत असा विरोधाभास का ?'' हे आशा ताई ह्यांनी विचारले .तेव्हा त्यांनी महिला दिनाची

ग्रुहकर्ज ..एक अनुभव

लेखक नि३ यांनी गुरुवार, 10/03/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घर घर चालु आहे...प्रत्येक विकांत असाच पायपिट करण्यात व्यर्थ ...१ BHK घ्याव कि २ BHK.ह्या एरीयात घ्याव की त्या तिथे पलीकडे...दिनोदीन जमिनीचे रेट वाढतच आहे..ग्रुहकर्जाचे व्याजदर पण..काही दिवस आणखी थांबलो तर घर घ्यायची लायकी राहणार नाही आपली पुण्यात. आणि नाही हो करता करता ..शेवटी एकदाचा बुक केला ...

मदत

लेखक महेश-मया यांनी बुधवार, 09/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी. देव आपले भले करो.

डॉ. जयंत नारळीकर - महाराष्ट्र भूषण

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 08/03/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा अमोल केळकर ---------------------- मला इथे भेटा

"माफ कर, अरुणा.....पण नाही तुला दयामरण !"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 07/03/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायद्यातील तरतुदीपुढे न्याय पीठासनदेखील हतबल होते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि गेली ३७ वर्षे जिवंतपणीच 'मरण' भोगत असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावतीने लेखिका पिंकी विराणी आणि अनेक वकिलांनी केलेल्या "दयामरण" अर्जातील विनंती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आणि ग्यान मिश्रा यांच्या खंडपीठाने "कायद्यात तरतूद नाही" या मुद्द्यावर फेटाळून लावली. "दयामरण" हा भारतातच नव्हे तर जगात अनेक देशात वारंवार चर्चेला येणारा विषय आहे. त्याची कारणमीमांसा करण्याअगोदर आपल्या कायद्यातील एका तरतुदीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 07/03/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे? जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही.

पत्रलेखन ... हरवत चाललेला ठेवा

लेखक शरद यांनी रविवार, 06/03/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. मी एक सोपा उपाय सुचवला होता. एक साधा स्कॅनर घ्या, कागदावर स्वहस्ताने खरडलेले पत्र स्कॅन करा व द्या पाठवून. निदान दोघींनी तो मानला व त्याचा इतका उपयोग झाल्याचे दिसून आले की त्यांच्या मैत्रिणी घरी पत्र लिहावयाच्या व यांच्याकडे येऊन, ते स्कॅन करून, आपापल्या मुलींना "पत्र" पाठवावयाच्या.

तीचे डोळे

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते. ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले. ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते.