Skip to main content

विचार

स्वामी विवेकानंद- भाग-१ - दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...

लेखक मारवा यांनी सोमवार, 15/12/2014 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी विवेकानंद एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विषयी विचार करतांना त्यांना एका साच्यात बसविता येत नाही. खर म्हणजे अस कोणत्याच माणसा विषयी होत नाही व करु नये अस वाटत. त्यांच्याविषयी कधी सहानुभुती वाटते कधी चीड निर्माण होते कधी त्यांच्यातली रसिकता भुरळ पाडते कधी आदर वाटतो कधी कौतुक. कधी आश्चर्य म्हणजे मिक्स्ड इमोशन्स म्हणतो तस मला वाटत. त्यांच समग्र साहीत्य वाचतांना त्यांचा पत्रसंग्रह मला विशेष आवडतो. कारण त्यातुन जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्यातील नरेंद्र नावाचा तरुण कधी कधी बाहेर येतो. तो नरेंद्र मला स्वामी पेक्षा जास्त जवळचा वाटतो आवडतो.

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/12/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे. नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही. पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही. वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही. सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही. पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्याला जे साध्य होत नाही त

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/12/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ भगवंत म्हणतात: १. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे २. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. ३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण.

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/12/2014 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य.

मिपाकराशी भेटताना....

लेखक अमितसांगली यांनी शुक्रवार, 05/12/2014 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
'दोस्त फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब वो फर्स्ट आता है तो और दुख होता है' असच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होत. मग त्यातून सुरु झाला सुख,समाधान,अपेक्षा,मागण्या,स्वार्थी मदत,निस्वार्थी मदत यासारख्या शब्दांचा खेळ. पण कळत नकळत भातुकलीच्या या खेळाचे प्रचंड यातनांमध्ये कधी रुपांतर झाले व अपेक्षांच्या ओझ्याची तलवार कधी मानेवर ठेवली ते कळलेच नाही. लहानपणापासून समाजसेवा,संशोधन असले विचार डोक्यात होते. शिक्षण चालू असेपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्नही करीत होतो. पण नोकरी लागली आणि प्रत्यक्षात GLAMOR या शब्दाचेच आकर्षण वाटू लागले. पैसा येऊ लागला,वाढू लागला पण त्याचबरोबर राहणीमान बदलले.

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 04/12/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.