मुळात आपल्याकडे सशक्त कथा, त्या कथेला न्याय देणारे कलाकार आणि त्या कलाकारांकडून कथेला साजेल असा अभिनय करून घेणारे दिग्दर्शक फार कमी.त्यातूनही "नायिकाप्रधान" सिनेमे फारच कमी, कधी-कधी एखादा "कहानी" किंवा "निरजा" (हा मात्र मी टॉकीज मध्ये बघीतला आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....)
नायिका प्रधान सिनेमे, नेहमीच वेग-वेगळ्या विषयांना हात घालतात.मग तो खामोशी असो किंवा मदर इंडिया किंवा मेमदिदी (https://www.youtube.com/watch?v=hVI7cLHX-Tk) आणि म्हणूनच मला तरी ते बघावेसे वाटतात.
असाच मग कधी-कधी जालावर शोध घेत