मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचार

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

पैसा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अक्षय१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही. टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे. (स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

अक्षय१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण...

अक्षय१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते.

जगाचं असंच असतं!!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!) जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.

नटरंग ,माझे पण एक parikshan

वाल्मिक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार तसा नटरंग खूप जुना आहे ,पण मी नुकताच बघितला मला आवर्जून खटकलेली गोष्ट ह्यात नायकाचे खरेच कलेवर प्रेम होते का ? आधी नाटक फक्त पैसे कमावण्यासाठीच केले जेवा फड कोसळला तेवा पण आधी घरची वाट पत्करली बायका पोरांनी बाहेर काढले तेव्हाच कलेची सेवा केली मग हा माणूस नटरंग कसा ?

मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुळात आपल्याकडे सशक्त कथा, त्या कथेला न्याय देणारे कलाकार आणि त्या कलाकारांकडून कथेला साजेल असा अभिनय करून घेणारे दिग्दर्शक फार कमी.त्यातूनही "नायिकाप्रधान" सिनेमे फारच कमी, कधी-कधी एखादा "कहानी" किंवा "निरजा" (हा मात्र मी टॉकीज मध्ये बघीतला आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....) नायिका प्रधान सिनेमे, नेहमीच वेग-वेगळ्या विषयांना हात घालतात.मग तो खामोशी असो किंवा मदर इंडिया किंवा मेमदिदी (https://www.youtube.com/watch?v=hVI7cLHX-Tk) आणि म्हणूनच मला तरी ते बघावेसे वाटतात. असाच मग कधी-कधी जालावर शोध घेत

बोर न्हाण

स्वीट टॉकरीणबाई ·
लेखनप्रकार
चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी. आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते.

सहावा वेतन आयोग - पगार झाले कमी

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहावा वेतन आयोग लागू झाल्याचा काही महिन्यानंतरची गोष्ट. माझा एक दाक्षिणात्य मित्र नागराजन (टोपण नाव) माझ्या केबिन मध्ये आला. येताच म्हणाला पटाईतजी, आपको मालूम है, हमारे साथ धोका हुआ है. मी विचारले कसे काय. नागराजन हा हिशोबात हुशार. रोकड अनुभागात काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव. निश्चित बिना कुठल्या ठोस आधारा शिवाय तो असे म्हणणार नाही. त्याचे म्हणणे होते जिथे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार वाढ १.८६% दिली तिथे उच्च श्रेणीच्या अधिकार्यांना २.६७% पगार वाढ दिली यातच सर्व गोम आहे. (अर्थात त्यांचा पगार १.८६ च्या हिशोबाने २६०४० च्या जागी २.६७च्या हिशोबाने ३७४०० वर निश्चित केला गेला).