किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने
रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये.
चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे.
शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात.
नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील.
एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते.
शेवट चिनू सातार्याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात.
सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला.
चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही.
अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.
वर्गीकरण
सबंध चित्रपटात एक उदासवाणे
चित्रपट पाहिला नाही पण परिचय
In reply to चित्रपट पाहिला नाही पण परिचय by प्रचेतस
मराठी ना सिनेमा... सिविल वॉर
In reply to मराठी ना सिनेमा... सिविल वॉर by वपाडाव
=)) =))
In reply to =)) =)) by किसन शिंदे
कुठलं हो?
In reply to =)) =)) by किसन शिंदे
सच्चं भणं गोदावरी का कायसं?
In reply to सच्चं भणं गोदावरी का कायसं? by सूड
अरे काय, कुठल्याही मराठी
In reply to अरे काय, कुठल्याही मराठी by प्रचेतस
छ्या आम्ही
In reply to छ्या आम्ही by नाखु
=)) =))
छान परीक्षण
In reply to छान परीक्षण by बोका-ए-आझम
दिग्दर्शक फ्रेमच्या प्रेमात
नितांत सुंदर चित्रपट आहे!
जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे.येऊ द्यात की तिथल्या निसर्गरम्य आठवणी! (म्हणजे लिखाणाच्या स्वरूपात )In reply to नितांत सुंदर चित्रपट आहे! by जव्हेरगंज
येऊ द्यात,
In reply to येऊ द्यात, by प्रदीप
चित्रिकरणाबद्दल जरूर लिहा
In reply to चित्रिकरणाबद्दल जरूर लिहा by पैसा
चित्रीकरण
In reply to चित्रीकरण by प्रदीप
छायचित्रणाच्या संदर्भात
In reply to छायचित्रणाच्या संदर्भात by सतिश गावडे
उत्तर
In reply to चित्रीकरण by प्रदीप
क्लोज अप्स नव्हते खरे
In reply to क्लोज अप्स नव्हते खरे by पैसा
'चूक' नव्हे
In reply to 'चूक' नव्हे by प्रदीप
तसे नाही
In reply to चित्रीकरण by प्रदीप
हा सिनेमा कृष्णधवल असता, तर
In reply to हा सिनेमा कृष्णधवल असता, तर by यशोधरा
ह्याविषयी
In reply to ह्याविषयी by प्रदीप
कृष्णधवल ची जादू
In reply to ह्याविषयी by प्रदीप
कृष्णधवल असता तर कदाचित तो
चित्रपट परिचय आवडला.
खूप छान लीहीले आहे.
वाह पै ताई. फेबु वर तुझी
सुंदर चित्रपटाचे सुंदर परीक्षण
फार सुरेख लिहिलंय. आता खूप
किल्ला नितांतसुंदर चित्रपट
In reply to किल्ला नितांतसुंदर चित्रपट by चावटमेला
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by पैसा
काळ
चित्रपट
वाह पैसाताई!
मस्त परीक्षण
लेख आवडला.
सुंदर चित्रपट परिचय !
चित्रपट परीक्षण आवडले.....
छान परीक्षण!
In reply to छान परीक्षण! by समीरसूर
मुलांसाठी नाहीये
In reply to मुलांसाठी नाहीये by पैसा
तुम्ही म्हणता तसे शक्य आहे.
In reply to मुलांसाठी नाहीये by पैसा
कथा
:( णॉस्टॅल्जिक :(
In reply to :( णॉस्टॅल्जिक :( by वपाडाव
अब रुलायेगा क्या "स्कॉलरशीप"?
In reply to अब रुलायेगा क्या "स्कॉलरशीप"? by सतिश गावडे
शिष्यवृत्ती
मस्तच ! प्रतिक्रियाही अत्यंत
मस्त लिहिले आहे, सेम अशाच
छान लिहिलंय !
In reply to छान लिहिलंय ! by ए ए वाघमारे
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
धन्यवाद!
लेख सुबक, पण परिचय काहीसा
छान परीक्षण. मीहि पाहिला
In reply to छान परीक्षण. मीहि पाहिला by शान्तिप्रिय
विहीर तर अजिबातच झेपला नव्हता
In reply to विहीर तर अजिबातच झेपला नव्हता by मराठी कथालेखक
'विहीर' भयंकर आवडला होता.
In reply to 'विहीर' भयंकर आवडला होता. by जव्हेरगंज
मलाही विहीर फार आवडला होता पण
छान परीक्षण. मीहि पाहिला
सुंदर समीक्षा
एक प्रश्न पडला
In reply to एक प्रश्न पडला by मारवा
मला वाटते
लहान मुलांचे भावविश्व वगैरे
पहायचा आहे अजुन.
एलिझाबेथ एकादशी आवडला.
In reply to एलिझाबेथ एकादशी आवडला. by सतिश पाटील
अशा चित्रपटांचे कथानक,
सुंदर सिनेमा आणि तेवढाच सुंदर
छान लेख
सरकारी नोकरी असल्यामुळे
किल्ला आवडला होता.
रिलीज झाला त्याच वीकेंडला
लेख सात वेळा वाचून झाला आहे.
आवडलेला चित्रपट पण अगदी
छान परीक्षण, मस्तं लिहिले
छान.
परीक्षण आवडलं.
सुरेख परिचय.पिक्चर बघतेच आता.
आवडलं
छान परीक्षण.
बघायचा राहिलाच. आधीही आत्ताही
चित्रपट आवडलाच, आणि हे
धन्यवाद!
लेखन आवडले. किल्ला पहिल्या