Skip to main content

संदर्भ

शब्दबंध २०१०

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/03/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

२ सेकन्दात स्वर्गानुभुति

लेखक तुका म्हणे यांनी सोमवार, 08/03/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पहिलेच लेखन. जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले :) तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत). टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी? असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे. या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य! मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही.

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी गुरुवार, 17/12/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 26/11/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. १) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक २) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी ३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी ४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री.

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 28/10/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते. ६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/09/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.

पाणीपुरी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 22/09/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.