Skip to main content

सद्भावना

प्रतिसाद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 11/05/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आपुलाची बोलु वाचे कौतुके वात येईल इतुके प्रतिसादे चौफेर रांधे जैसे भातुके खेळे नृपकन्या बोलाची कढी बोलाचेची बोलु बोलाचेची खापरें पुसोनी तैया ताजी होई .....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले
Taxonomy upgrade extras

संवादाचा सुवावो

लेखक भोचक यांनी रविवार, 03/05/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.

महाराष्ट्रधर्म

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 01/05/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी मनांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

आदरांजली !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 27/04/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिध्द सिने अभिनेते फिरोज खान यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे फिरोज खान हे खुप दिवसांपासुन कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने आजारी होते रविवारी रात्री बेंगळुरु ईथल्या त्यांच्या फार्म हाउसवर त्यांचे निधन झाले फिरोज खान म्हणजे बॉलिवुडमधील बोल्ड आणी स्टाइलिश व्यक्तीमत्व होत त्यांचे गाजलेले चित्रपट म्हनजे कुर्बानी, दयावान अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली

एक व्य नि..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/04/2009 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :) आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्‍या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही.

अभिनंदन

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/04/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली?

चैत्रगौर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 09/04/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.

तु !

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?