Skip to main content

प्रकटन

हानामी (花見) : साकुरा

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 02/07/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
हानामी (花見) : साकुरा हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ. वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते.

टीव्हीतली दुनिया

लेखक प्रास यांनी शनिवार, 02/07/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा. या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे.

बदल ----लघुकथा ----जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले. या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले. अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले! विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले. फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले. कसला? ब्रम्हदेवांनी विचारले. काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारदमुनी म्हणाले. असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले. ह्या लोकशाही बद्दल सर्वत्र फार गोड गोड बोलल्या जाते आणि फार छान सुंदर सुंदर लिहिल्या जाते.

...... नेहमीसारखा...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 30/06/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला... कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत... एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती.. जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके... त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा... जगायलाच विसरलोय आता.. आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय... सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर... त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो...

चार आणे

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/06/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी असतात छोट्या, त्यांच्या असण्याने किंवा असताना फारसा फरक पडलेला नसतो / पडत नाही. मात्र तरीही त्या गेल्या / नसल्या कि मात्र चुकल्यासारख होतं. मागे टाइपराइटरने शेवटचे कडकटट केले आणि आज 'चार आणे' बंद होत आहेत. माझ्या लहानपणी (म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी) ह्या चार आण्याला किंमत होती.

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 29/06/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री.

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

परी आणि भूताची गोष्टं ---- जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी रविवार, 26/06/2011 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते. वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील.

माझिया प्रियाला प्रीत कळेना

लेखक michmadhura यांनी शनिवार, 25/06/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नी माझी भेट ही क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे सांगु कशा मी, तुल सख्या रे माझ्या ह्या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना! खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना! आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.