Skip to main content

प्रकटन

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

"नेकी कर और दर्या में डाल"

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 02/07/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईने माझ्यावर अजून एक चांगला संस्कार केला. "नेकी कर और दर्या में डाल." कं.त काम करत असतांना पण , मी माझ्या हाताखालच्या माणसांना, मनापासून शिकवायचो.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो.कधी-कधी परीक्षा पण घेत होतो.कामावर असतांना, वाद-विवाद करायचो आणि त्याचा अंत सूसंवादाकडे कसा होइल ह्याकडे लक्ष द्यायचो.हाताखालून हजारो माणसे गेली तशीच पाठीवर शाबासकीची थाप ठोकून पण शेकडो गेली. सध्यी मी नौकरी बदलायच्या विचारात आहे.जे शिकायचे होते , ते शिकून झाले.

आपण पहिला घोट कधी घेतला ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 01/07/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो.

वरदान (कथा)

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 29/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले.

नेमक काय कराल?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 28/06/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद. हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला. आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश. हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता. परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम पुण्यात पोचला. मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही. पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही. ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी

प्रणाम अनाम वीरांना...

लेखक सुधांशुनूलकर यांनी गुरुवार, 28/06/2012 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्‍‍यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही.

किंकर सेन्सेई

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/06/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना 'गाठ' पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते.