Skip to main content

प्रकटन

सहजच..१

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 29/09/2012 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या जिवनात कळत ऩकळत किती लहान मोठे प्रसंग अविरत घडत असतात. कधी ते आपल्याला हसवता,,राग आनतात , कधी दुखी करतात तर कधी उद्वीग्न कधी समधानी करतात . अशाच लहान मोठ्या प्रसंगांना कलमबद्ध करन्याचा एक प्रयत्न करत आहे , बघा आवडले तर अजुन लिहीन. हो तर सुरुवात घरी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगापासुन करु या , मी व सौ सहजच गप्पा मारत बसलो होतो आणि विशय निघाला नविन घराच्या बांधकामाचा , एक जागा दोन वर्शा पासुन घेवुन ठेवली आहे पन काम चालु करयला या ना त्या कारनाने उशीर होत आहे. बोलता बोलता बांधने बांधकाम सारखे शब्द वारवार येत होते .

सेन्टी मेन्टी : || You Bloody Civilian ||

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 25/09/2012 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : पात्रांच्या आणि प्रसंगाच्या अनूषंगाने शिव्या आणि ईग्रंजी शब्दांचा वापर करण्याची मुभा लेखकाने घेतली आहे, संपादक मंडळ, मालक त्याच्या शी सहमत असतील च असे नाही.हा निर्णय पुर्णतः माझा आहे.

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.