Skip to main content

प्रकटन

आपण सारे झिंगु ....

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 14/10/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते त्या अर्जुनी गावाजवळ महाराष्ट्रातले कॉलेज आहे. तिथे त्याने अकराव्वी बारावी केली. पुढे सांगली आणि पुणे. आता तो बंगळूरू मध्ये स्थाईक. मी सातवी पर्यंत कर्नाटकातल्या शाळेत. मित्र अर्जुनीच्या म्हंजे महाराष्ट्रातल्या शाळेत गेले म्हणुन तिथे गेलो. पुढे इंजीयारिंग महाराष्ट्रात.

लवकरच एका सुर्याचा अस्त...!

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 13/10/2012 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
'I don't think I have plenty of cricket left in me'--सचिन तेंडुलकर हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले... सचिन...सगळ्यांचा "तेंड्ल्या" आपल्याला काही दिवसानंतर कधीच त्या खेळतट्टी दिसणार नाही, या विचरानेच मन बैचेन झाले. क्रिकेट ते पण तेंडल्या शिवाय विचार ही करवत नाही. त्याची २३ वर्षांची कारकिर्द डोळ्या समोर आली... १६ वर्षांचा असताना न घाबरता "वसिम अक्रम, वकार युनुस सारख्या बॉलरला सामोरा गेलेला... ते आत्ता मागच्या वर्षी वल्ड्-कप जिंकल्यावर पळत येउन युवराजला मिठी मारणारा सचिन... सामना चालु असताना...सचिन आउट झाला तर आपण टि.वी बंद करायचो...

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/10/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले आता?”, कोणीतरी. “अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा. “काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर. “बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका. “आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर. “मग काय!

उर्ध्वश्रेणीचे (आंबट) वरण

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 03/10/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचा पंचवर्षीय वाढदिवस नुकताच साजरा झाला..... त्यानिमित्ताने अलिकडे उंबराचे फूल झालेल्या बर्‍याच लेखकांनी लेखनाची हौस पुरवून घेतली!!

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर

महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 02/10/2012 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light.