Skip to main content

प्रकटन

चिरफाड

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 16/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न - मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे . असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय.

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

लेखक अनघा आपटे यांनी बुधवार, 14/11/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
मेल बॉक्स उघडल्यावर नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते.

सवा डॉलर चढाऊंगी (एक आध्यात्मिक दृष्टीकोन)

लेखक सूड यांनी मंगळवार, 13/11/2012 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे. हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा। पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥ वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे.

हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 13/11/2012 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ? असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर. तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा. सुरुवात स्वत:पासून करतो: --------------------------------------------------------------------------------------------------------------- सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.

राजकारण: एक आठवण

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 04/11/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे. मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला).

चावडीवरच्या गप्पा – बस डे

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 01/11/2012 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत. “अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या. “अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने. “काय झाले?”, इति नारुतात्या. “अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात. “अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या. “शिंचा बस डे म्हणे!

त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 01/11/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं. निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो. लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या. ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा..

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

लेखक औदुंबर यांनी गुरुवार, 01/11/2012 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!